शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

आंबोली घाटातील स्टॉल्सचा प्रश्न निकाली, शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आले धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:39 IST

वनविभागाने अंधाराचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटातील स्टॉल्स तोडून टाकत आतील सामान घाटात फेकून दिले होते. या विरोधात भाजप- शिवसेनेच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना जाब विचारताच स्टॉल पुन्हा एकदा लागले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यानी स्टॉलधारकांना एकत्र केले, तर राजन तेलींच्या माध्यमातून वनमंत्र्यांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.

ठळक मुद्देआंबोली घाटातील स्टॉल्सचा प्रश्न निकाली शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आले धावून

सावंतवाडी : वनविभागाने अंधाराचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटातील स्टॉल्स तोडून टाकत आतील सामान घाटात फेकून दिले होते. या विरोधात भाजप- शिवसेनेच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना जाब विचारताच स्टॉल पुन्हा एकदा लागले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यानी स्टॉलधारकांना एकत्र केले, तर राजन तेलींच्या माध्यमातून वनमंत्र्यांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.आंबोली घाटात गेली अनेक वर्षे आंबोली, चौकुळ ग्रामस्थ स्टॉल लावतात. यातून येणाऱ्या पर्यटकांना जागेवरच खाद्य मिळते. त्यामुळे स्टॉलधारकांना रोजगारही मिळतो. तसेच पर्यटकांची पायपीटही थांबते. पण गेली दोन वर्षे वनविभागाचे अधिकारी या स्टॉलवर हातोडा फिरवित आहेत.

ऐन पावसाच्या तोंडावर या स्टॉलधारकांचा व्यवसाय होत असतो. त्याचवेळी वन विभागाला जाग येत असते. गेल्या वर्षीही असाच प्रकार झाला होता. त्यावेळीही वनविभागाला जाब विचारताच त्यांनी स्टॉलधारकांपुढे नमते घेत पुन्हा स्टॉल उभारणीस परवानगी दिली होती.मात्र, दोन दिवसांपूर्वी वन विभागाचे काही अधिकारी अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास स्टॉलवर गेले आणि सर्व स्टॉल्स कटरने तोडून टाकले. यात किमती ताडपत्री तसेच हॉटेलमधील सामान होते. हे सर्व सामान दरीत फेकून दिले. तसेच पुन्हा स्टॉल लावल्यास पुन्हा तोडून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे स्टॉलधारक दोन दिवस शांत होते. मात्र, दोन दिवसांनंतर भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग हे आंबोलीत गेले. त्यांनी यातील काही स्टॉलधारकांना धीर दिला आणि त्यांना सावंतवाडीत आणत उपवनसंरक्षकांची भेट घालून दिली.त्याचवेळी तेथे भाजपचे माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे रुपेश राऊळ, राघोजी सावंत, शब्बीर मणियारही दाखल झाले. या सर्वांनी उपवनसंरक्षक चव्हाण यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चव्हाण यांना स्टॉलधारकांचा प्रश्न सोडवा, असे आदेश दिल्यावर लागलीच प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर स्टॉलधारक आंबोली येथे गेले. त्यांनी आपले स्टॉल पूर्ववत लावले आहेत. आता या स्टॉलधारकांची यादी उपवनसंरक्षकांनी बनवली असून, त्याप्रमाणेच हे स्टॉल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सारंग यांनी या स्टॉलधारकांना एकत्र केले नसते तर यावर तोडगाच निघू शकला नसता, असे स्टॉलधारकांनी सांगितले. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग