शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चित्र-शिल्प संमेलन यशस्वी करणार

By admin | Updated: December 1, 2014 00:19 IST

कणकवलीतील बैठकीत निर्धार : नगराध्यक्षांकडून सहकार्याची ग्वाही

कणकवली : शहरात प्रथमच अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी शहरवासीयांकडून योगदान मिळेल. तसेच विविध स्तरावर मदत उपलब्ध करून हे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार मान्यवरांनी येथील बैठकीत व्यक्त केला.
अखंड लोकमंच सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने शहरात होणाऱ्या अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलनाच्या नियोजनाची बैठक नामानंद मोडक यांच्या अध्यक्षतेखाली भवानी मंगल कार्यालयात झाली. यावेळी विविध संस्था प्रतिनिधींसह आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, नगराध्यक्षा प्रज्ञा खोत, रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण, दिग्दर्शक सुहास वरूणकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते भाई खोत, अशोक करंबेळकर आदींनी संमेलनासाठी सहाय्य करण्याची ग्वाही दिली.
संमेलनामागील भूमिका मांडताना मोडक म्हणाले की, आजवर साहित्य संमेलन, नाट्य, संगीत, गझल संमेलने होतात. या संमेलनांत सजावट, नेपथ्य, रंगकाम, रांगोळी आदींचा समावेश होतो. त्यासाठी राबणारे कलाकारांना त्या मंचावर अभिव्यक्त होता येत नाही. त्यामुळे चित्र, शिल्प, याबरोबरच छायाचित्रकार, रांगोळीकार, मूर्तीकार, नेपथ्यकार, व्यंगचित्रकार या सर्वांच्या कलांना मुक्ताविष्कार देणारे संमेलन कणकवलीत आयोजित करण्यात आहे.
प्रा. विजय जामसंडेकर म्हणाले की, व्यक्त होण्याचे चित्र हे प्रभावी माध्यम आहे. भाषा किंंवा इतर कला चित्रांच्या माध्यमातून शिकता येतात. चित्र, शिल्प कलेवर जगभरात मोठे काम होत आहे. त्यात आपले कलाकार मागे पडू नयेत. यासाठी अशी संमेलने व्हायला हवीत.
आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत यांनीही संमेलन यशस्वी करण्याची भूमिका मांडली. चित्र-शिल्प संमेलन कणकवलीत होत असून ते भूषणावह असल्याचे नगराध्यक्षा अ‍ॅड. खोत म्हणाल्या. नगरपंचायतीचे सहकार्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सुहास वरूणकर यांनी कलासंमेलनाच्या माध्यमातून शहरात सांस्कृतिक केंद्र उभे रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नियोजन बैठकीत प्रा. हरिभाऊ भिसे, मूर्तिकार मारूती पालव, आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, नगरसेवक सुशांत नाईक, दशावतारी कलावंत बी. के. तांबे, हरी परब, नारायण हजेरी आदी मान्यवरांनी विचार मांडले. विजय पालकर, मनोज मेस्त्री, इंद्रजित खांबे, प्रशांत काणेकर, राखी अरदकर, समीर गुरव, चेतन तारी आदी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार संतोष राऊळ यांनी मानले. (प्रतिनिधी)