शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:51 IST

जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत

कणकवली : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार, अशी धमकी देणाऱ्या नारायण राणे यांनी आधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करावा. तसेच बंद चिपी विमानतळ सुरू करावे. त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा कराव्यात, असा टोला उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नारायण राणे हे गेली साडेतीन वर्षे केंद्रीय मंत्री होते. आता लोकसभेचे खासदार आहेत. त्यांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करता आले नाही. आम्ही सुरू केलेले चिपी विमानतळ त्यांच्या कार्यकाळात बंद पडले. ते त्यांना सुरू करता आलेले नाही. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार अशा धमक्या ते देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेहमीच विकासाला योगदान दिले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग पूर्ण झाला. मात्र, इतर जिल्ह्यात हा महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही.

केंद्रीय मंत्री असताना नारायण राणेंनी हा महामार्ग का पूर्ण करून घेतला नाही. चिपी विमानतळ सुरू करण्याच्या केवळ राणे घोषणा करीत आहेत. आता शक्तिपीठ महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून आर्थिक देवाण घेवाणीसाठी राणेंना शक्तिपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबा असेल.जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेतशेतकऱ्यांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत. त्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भीक घालणार नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. मात्र, राणेंना मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करता आला नाही. चिपी विमानतळ सुरू करता आले नाही. लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पाचे काय झाले? त्यामुळे विकासावर बोलण्याचा राणेंना कुठलाही अधिकार नाही, असेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गNarayan Raneनारायण राणे Vaibhav Naikवैभव नाईक