शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
3
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
4
“पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
5
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
6
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
7
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
8
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
9
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
10
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
11
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
12
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
13
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
14
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
15
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
16
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
17
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
18
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
19
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
20
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...

..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:51 IST

जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत

कणकवली : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार, अशी धमकी देणाऱ्या नारायण राणे यांनी आधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करावा. तसेच बंद चिपी विमानतळ सुरू करावे. त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा कराव्यात, असा टोला उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नारायण राणे हे गेली साडेतीन वर्षे केंद्रीय मंत्री होते. आता लोकसभेचे खासदार आहेत. त्यांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करता आले नाही. आम्ही सुरू केलेले चिपी विमानतळ त्यांच्या कार्यकाळात बंद पडले. ते त्यांना सुरू करता आलेले नाही. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार अशा धमक्या ते देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेहमीच विकासाला योगदान दिले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग पूर्ण झाला. मात्र, इतर जिल्ह्यात हा महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही.

केंद्रीय मंत्री असताना नारायण राणेंनी हा महामार्ग का पूर्ण करून घेतला नाही. चिपी विमानतळ सुरू करण्याच्या केवळ राणे घोषणा करीत आहेत. आता शक्तिपीठ महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून आर्थिक देवाण घेवाणीसाठी राणेंना शक्तिपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबा असेल.जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेतशेतकऱ्यांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत. त्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भीक घालणार नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. मात्र, राणेंना मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करता आला नाही. चिपी विमानतळ सुरू करता आले नाही. लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पाचे काय झाले? त्यामुळे विकासावर बोलण्याचा राणेंना कुठलाही अधिकार नाही, असेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गNarayan Raneनारायण राणे Vaibhav Naikवैभव नाईक