शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‎वैभव नाईक शिंदेसेनेत आल्यास नीलेश राणे स्वागतच करतील; मंत्री ‎उदय सामंतांनी दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:03 IST

कुडाळ : सिंधुदुर्गात उद्धवसेनेत फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक हे शिंदेसेनेत आले ...

कुडाळ : सिंधुदुर्गात उद्धवसेनेत फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक हे शिंदेसेनेत आले तर आमदार नीलेश राणे हे ही त्यांचे पक्षात स्वागत करतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत व्यक्त करत वैभव नाईक यांना पक्षात येण्याचे थेट आमंत्रण दिले.‎शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुडाळ येथे आभार मेळावा सुरू होण्याअगोदर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपस्थित होते.मंत्री सामंत म्हणाले, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभासद नोंदणीसाठी आलो होतो. भाजपाचा कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता आम्ही आमच्या पक्षात घेतला नाही. तरीही भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांशी अगोदर बोलून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी सावंत यांना दिला.

उद्धवसेनेचे दीड हजार कार्यकर्ते शिंदेसेनेत येणार‎ते म्हणाले, काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेमुळे कुडाळ येथील जो आभार मेळावा होता तो अत्यंत साध्या पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यासाठी येणारे राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते एकनाथ शिंदे यांचेही साध्या पद्धतीने स्वागत करणार आहोत. या मेळाव्यात उद्धवसेनेचे सुमारे दीड हजारच्या वर पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

मंत्री नितेश राणेही माझ्या मतदारसंघात येतात‎मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाच्या सभासद नोंदणीसाठी आलो. महायुतीतील भाजपा तसेच इतर मित्रपक्षांच्या कोणत्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मी पक्षप्रवेश घेतला नाही. तरीही त्यावेळी मी केलेल्या भाषणाचा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गैरसमज करून घेतला. पालकमंत्री नितेश राणे हेही माझ्या मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी येतात, ते पक्षाचे काम आहे. यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही, असे त्यांनी सांगितले.

‎कुडाळ एमआयडीसीमधील कामांची चौकशी‎कुडाळ एमआयडीसीमध्ये जे ८० लाखांचे काम करण्यात आले, त्या कामाची मी चौकशी लावणार आहे. काम चांगले झाले नाही तर परत काम करून घेणार, असा इशाराही सामंत यांनी दिला. कुडाळ जुनी एमआयडीसी असून, पर्यटन जिल्हा झाल्यानंतर येथील निकष बदलले. त्यामुळे आता आडाळी येथे जी एमआयडीसी सुरू केली आहे त्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाministerमंत्रीUday Samantउदय सामंतVaibhav Naikवैभव नाईक Nilesh Raneनिलेश राणे