शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

‎वैभव नाईक शिंदेसेनेत आल्यास नीलेश राणे स्वागतच करतील; मंत्री ‎उदय सामंतांनी दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:10 IST

कुडाळ : सिंधुदुर्गात उद्धवसेनेत फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक हे शिंदेसेनेत आले ...

कुडाळ : सिंधुदुर्गात उद्धवसेनेत फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक हे शिंदेसेनेत आले तर आमदार नीलेश राणे हे ही त्यांचे पक्षात स्वागत करतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत व्यक्त करत वैभव नाईक यांना पक्षात येण्याचे थेट आमंत्रण दिले.‎शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुडाळ येथे आभार मेळावा सुरू होण्याअगोदर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपस्थित होते.मंत्री सामंत म्हणाले, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभासद नोंदणीसाठी आलो होतो. भाजपाचा कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता आम्ही आमच्या पक्षात घेतला नाही. तरीही भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांशी अगोदर बोलून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी सावंत यांना दिला.

उद्धवसेनेचे दीड हजार कार्यकर्ते शिंदेसेनेत येणार‎ते म्हणाले, काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेमुळे कुडाळ येथील जो आभार मेळावा होता तो अत्यंत साध्या पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यासाठी येणारे राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते एकनाथ शिंदे यांचेही साध्या पद्धतीने स्वागत करणार आहोत. या मेळाव्यात उद्धवसेनेचे सुमारे दीड हजारच्या वर पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

मंत्री नितेश राणेही माझ्या मतदारसंघात येतात‎मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाच्या सभासद नोंदणीसाठी आलो. महायुतीतील भाजपा तसेच इतर मित्रपक्षांच्या कोणत्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मी पक्षप्रवेश घेतला नाही. तरीही त्यावेळी मी केलेल्या भाषणाचा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी गैरसमज करून घेतला. पालकमंत्री नितेश राणे हेही माझ्या मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी येतात, ते पक्षाचे काम आहे. यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही, असे त्यांनी सांगितले.

‎कुडाळ एमआयडीसीमधील कामांची चौकशी‎कुडाळ एमआयडीसीमध्ये जे ८० लाखांचे काम करण्यात आले, त्या कामाची मी चौकशी लावणार आहे. काम चांगले झाले नाही तर परत काम करून घेणार, असा इशाराही सामंत यांनी दिला. कुडाळ जुनी एमआयडीसी असून, पर्यटन जिल्हा झाल्यानंतर येथील निकष बदलले. त्यामुळे आता आडाळी येथे जी एमआयडीसी सुरू केली आहे त्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाministerमंत्रीUday Samantउदय सामंतVaibhav Naikवैभव नाईक Nilesh Raneनिलेश राणे