शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 1:27 PM

sindhudurg, mahavitaran, mns, kankavli सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल माफी करणार अशी घोषणा करून ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली आहे. त्याविरोधात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे वीज बिलांबाबत मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार जनतेच्या प्रश्नांसाठी राज ठाकरेंच्या आदेशानुसार होणार आंदोलन : उपरकर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल माफी करणार अशी घोषणा करून ऐनवेळी जनतेची फसवणूक राज्यकर्त्यांनी केली आहे. त्याविरोधात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे आदेश देतील त्यानुसार जिल्ह्यात आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.ते म्हणाले, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांबाबत निवेदन दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येत्या काळात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर जनतेच्या प्रश्नांसाठी मनसे खळखट्याक आंदोलन छेडणार आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शैलेश अंधारी, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, विनोद सांडव, सुनील गवस, चंदन तेली, सनी बागकर, विनायक गावडे, राजू गुरव आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक कणकवलीत झाली. त्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सरकारला सोमवारपर्यंत राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर मोर्चा किंवा अन्य आंदोलन केले जाईल. हे वीज बिल माफी आंदोलन जनतेला घेऊन केले जाईल.सिंधुदुर्गातील अवैध धंद्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. गोवा बनावटीची दारू, मटका, जुगार, अवैध गुटखा विक्री होत आहे. त्यावर निवेदन देऊनही ते चालूच आहेत.मोठ्या प्रमाणात होतेय अवैध वाळू वाहतूकगोवा बनावटीच्या दारुची विक्री करणाऱ्यांना पोलीस साथ देत आहेत. तसेच अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गोव्यात ओव्हरलोड वाळू वाहतूक होत आहे. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी व आरटीओ यांना भेटून ओव्हरलोड वाळू गोव्यात जाते कशी? सीसीटीव्ही लावले आहेत त्याठिकाणी तपासणी का होत नाही? दारू आणि गुटख्याची मुख्य सेंटर बांद्यात आहेत. त्याबाबत आम्ही आवाज उठवित आहोत. पोलिसांनी कारवाई न केल्यास मनसेचे कार्यकर्ते धाडी टाकतील, असा इशाराही परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरणKankavliकणकवली