शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कणकवली नगरपंचायतीच्या कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे ; सुशांत नाईक यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 6:04 PM

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे असतात. आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायतीच्या कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे सुशांत नाईक यांचा आरोप'त्या' नगरसेवकांची आगपाखड़ का?नगरपंचायत कारभारावर वचक ठेवणार !

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत कायमच साटेलोटे असतात. यावर्षीची निविदाहि जादा दर दिलेल्या ठेकेदाराचीच मंजूर करण्यात आली होती. मात्र , ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांचे त्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.येथील विजय भवनमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, शहरप्रमुख शेखर राणे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, सुजीत जाधव, भुषण परुळेकर, अजित काणेकर,तेजस राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी सुशांत नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरातील कचरा उचलण्याची एक वर्षाच्या कालावधिसाठीची निविदा मे महिन्यात प्रसिध्द झाली होती. प्रति घर 195 रूपये असा जादा दर नमूद केलेल्या ठेकेदाराची निविदा मंजूर करुन त्याला ठेका देण्यात आला होता .तर कमी दराची म्हणजेच प्रति घर 145 रूपये दर नमूद केलेल्या दुसऱ्या ठेकेदाराची निविदा नामंजूर करण्यात आली होती.या निविदेबाबतचे सत्य शिवसेना नगरसेवकांच्यासमोर आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांचे त्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. त्याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित जादा दराची निविदा रद्द करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्याना दिले. त्यामुळे जादा दराची निविदा रद्द करण्यात आली.त्यानंतर परत निविदा प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी कचरा उचलण्याची तीच निविदा प्रति घर 143 रूपये दराने त्याच ठेकेदाराने भरली. आणि ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कचरा उचलण्याचा ठेका त्याला मिळाला आहे.कणकवलीतील शिवसेनेच्या नगरसेवकांच्या जागरूकपणामुळे तसेच आमदार वैभव नाईक यांच्या दक्षतेमुळे कणकवली नगरपंचायतीचे म्हणजेच पर्यायाने शहरातील नागरिकांचे प्रति महीना 4 लाख रूपये वाचले आहेत. तसेच या निविदेपोटि जादा खर्च होणारे नगरपंचायतीचे वार्षिक 48 लाख रूपये वाचले आहेत. हे शिवसेना नगरसेवकांमुळेच घडले आहे.सध्या शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून दरदिवशी 50 टक्केच कचरा उचलला जातो. त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात. याबाबतही मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच नगरपंचायतीत पारदर्शक कारभारासाठी यापुढेही शिवसेना नगरसेवक कारभारावर बारकाईने लक्ष ठेवतील असेही सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.'त्या' नगरसेवकांची आगपाखड़ का?दरवर्षी कणकवली शहरातील हा कचरा उचलण्याच्या ठेका एकाच ठेकेदाराला दिला जातो. तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता आहे. ही निविदा प्रक्रिया संगनमतानेच केली जाते.

 

याबाबत नगरपंचायत सभेत आम्ही मुद्दा उपस्थित केला असता त्यावेळी स्वाभिमानच्या नगरसेवकांनी आगपाखड केली होती. ती का करण्यात आली ? त्यामागचे नेमके गुपित काय? हे त्यांनी जनतेच्या समोर जाहिर करावे.असेही सुशांत नाईक यांनी यावेळी म्हणाले.नगरपंचायत कारभारावर वचक ठेवणार !कणकवली शहरातील नागरिकांशी आमची बांधीलकी आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर शिवसेनेचे नगरसेवक वचक ठेवण्याचे काम करीत आहेत. प्रशासनाने नागरिकांना चांगल्या सुविधा पूरवाव्यात यासाठी आमचा कायमच आग्रह रहाणार आहे.असेही सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गpanchayat samitiपंचायत समिती