शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कणकवली बनली पुन्हा चिखलमय; नागरिक त्रस्त, अपघाताची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:46 PM

कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखलमय बनल्याने वाहनचालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देकणकवली बनली पुन्हा चिखलमय; नागरिक त्रस्तमातीचा भराव वाहून महामार्गावर, अपघात होण्याची शक्यता!

कणकवली : कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखलमय बनल्याने वाहनचालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.कणकवली शहरातील नागरिकांनी पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला इशारा दिला होता. मात्र कशाचेच काहीही न वाटणाऱ्या दिलीप बिल्डकाँन या महामार्ग ठेकेदार कंपनीने आवश्यक अशी कोणतीही कामे केली नाहीत.

रामेश्वर प्लाझा नजीक असलेल्या नाल्याचे काम करण्यासाठी तेथील महामार्गच खोदण्यात आला आहे. तसेच याठिकाणी महामार्ग परिवर्तीत करण्यात आला आहे. हा महामार्ग कच्चा असल्याने तो पावसाच्या पाण्याने चिखलमय बनला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना महामार्गावरून चालणे कठीण बनले आहे.पावसाच्या तुरळक सरी सध्या कोसळत असताना पाण्याचा फटका वाहन चालक आणि कणकवली परिसरातील सर्वसामान्यांना बसत आहे. जर मुसळधार पाऊस पडला तर नेमकी महामार्गाची काय स्थिती होईल ? या विचारानेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनचा बेजबादारपणा कणकवलीवासीयांना भोवत आहे. शहरातील मान्सूनपूर्व कामे करण्याचे आश्वासन देऊनही ते या कंपनीने पाळले नाही.त्याचा फटका आता कणकवली वासियाना बसत आहे.सर्व्हिस रोड लगत गटारे न बांधता केलेल्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालताना तसेच वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.महामार्ग ठेकेदाराने गटारे मोकळी न केल्याने महामार्गालगत अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. तर दिलीप बिल्डकॉनच्या बेफिकीर वृत्तीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अपघात होण्याची शक्यता!पावसाच्या पाण्यामुळे महामार्गावर चिखल निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यातच चिखलापासून वाचण्यासाठी पादचारी डांबरी रस्त्यावर येतात. याचवेळी अचानक एखादे वाहन आल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 कणकवली शहरातील महामार्ग बुधवारी पुन्हा एकदा चिखलमय झाला होता. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग