शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून उदय सामंत यांना जठार यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 3:21 PM

जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून उदय सामंत यांना जठार यांचा टोलाअविचारी वागणे जनता सहन करणार नाही : प्रमोद जठार, भानावर येत विधाने करा

कणकवली : जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून लगावला आहे.रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची रेषा आहे असे वक्तव्य राज्यमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. जनतेच्या इच्छा, आकांक्षांचे मालक नव्हे. असा टोला त्यांनी जठार यांनी लगावला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनानंतरची बेरोजगारीची स्थिती भयानक आहे. युवावर्गावर तुमच्या या विचारांचे सावट पाडू नका. कोकणच्या अनेक पिढ्या रोजगारासाठी मोठ्या शहरात विस्थापित झाल्या होत्या. आता कोकणात परतणाऱ्या नव्या पिढ्या तुमचे काळ्या दगडावरचे नकार स्वीकारायच्या मन:स्थितीत नाहीत.

तुमच्या सफेद रेषांसह काळे नि दुर्दैवाने कोकणातून निवडून आलेले हे खासदार, आमदारांसारखे काळे दगड आता कोकणच्या समुद्राच्या तळाशी कायमकरता फेकले जातील हे लक्षात घ्यावे. नाणार प्रकल्प हा कोकणचा आर्थिक कायापालट करून टाकण्याची क्षमता असलेला प्रकल्प आहे.

दीड ते दोन लाख लोकांना रोजगार देण्याची ताकद आणि रोजगाराच्या अप्रत्यक्ष लाखो संधी देणारा हा प्रकल्प आहे. कोकणी जनतेचे प्रतिनिधी म्हणून या प्रकल्पात जास्तीच जास्त स्थानिक जनतेला संधी मिळण्यासाठी इथले शिवसेना आमदार आणि खासदार आक्रमकपणे उभे राहिले असते तर ते कौतुक करण्यासारखे होते. पण अशी संधी देणारा प्रकल्प नाकारणारे मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या नशिबाचे भोग आहेत. इथल्या बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी या सत्ताधारी मंडळींनी आजवर काय केले?शेकडो कामांची कंत्राटे स्वकियांच्या नावावर घेत गडगंज संपत्ती कमवायची आणि बेरोजगार वर्गाला संधी देणारे प्रकल्प नाकारत भीकेला लावायचे. हे यांचे उद्योग आता जनता अजिबात सहन करणार नाही.

यासाठी प्रसंगी जनतेला रस्त्यावर उतरण्यासाठी आपण नक्कीच सामर्थ्य देऊ. अजूनही केंद्र सरकारचा नाणार प्रश्नासाठीचा दोन महिन्यांचा अल्टीमेटम आहे. स्थानिक जनता विनयपूर्वक हा प्रकल्प इथेच व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालत आहे. स्वत:च्या जमिनी स्वेच्छेने प्रकल्पासाठी देत आहेत, याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.स्वहितासाठी जनतेचा बळी द्याल, तर ती इंगा दाखविलस्वहितासाठी जनतेच्या हिताचा बळी द्याल, तर कोकणी जनतेचा इंगा काय असतो हे ती दाखविल्याशिवाय राहणार नाही. तुमचा नकार असाच कायम राहिला तर हा प्रकल्प राजापूर येथे झालाच पाहिजे यासाठी लवकरच कोकणी जनता महा-जनआंदोलन उभे करील.तसेच हे सरकार कोकणच्या समुद्रात बुडविल्याशिवाय राहणार नाही.

तुम्हांला रिफायनरी नको तर आम्हांला शिवसेना नको ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे असे उदय सामंत यांनी समजावे, असेही प्रमोद जठार यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी