शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताकेंद्र बदलाचे वारे, भाजप सत्तेत आल्यास नीतेश राणेंना मंत्रिपदाची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 11:50 IST

भाजपाची सत्ता आल्यास आमदारकीची दुसरी टर्म निवडून आलेल्या आणि भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविल्यानंतर भाजपकडून आता बदलासाठीच्या राज्यात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून आपल्यासमवेत ३० ते ३५ आमदारांना घेऊन भाजपाप्रणित गुजरात राज्यात आसरा घेतला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला असून शिंदे यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांमध्ये कोकणातील काही आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार नीतेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तसेच सत्ताबदल झाल्यास नीतेश राणे है सिंधुदुर्गचे पालकमंत्री होण्याची शक्यता राजकीय धुरिणांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात विधानसभेचे तीन आमदार आहेत. यात कणकवली देवगड, वैभववाडी या मतदार संघातून भाजपाचे आमदार नीतेश राणे तर उर्वरित म्हणजे कुडाळ, मालवणसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या मतदार संघासाठी सेनेचे दीपक केसरकर हे आमदार आहेत. त्यामुळे सद्य राजकीय परिस्थितीचा विचार करता तीनपैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. तर एक भाजपचा.जिल्ह्यात सेनेचे दोन आमदार असतानाही या दोघांनाही बाजूला करत ठाकरे सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्रीदेखील करण्यात आले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत या राजकीय नाट्यावरून शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूरदेखील होता. मात्र, त्याला वाचा फोडण्यासाठी कोण पुढे येत नव्हते.वैभव नाईक जायंट किलर ठरूनही दुर्लक्ष

  • शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी २०१४ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कुडाळ-मालवण मतदार संघामद्ये सर्वप्रथम पराभव करत याठिकाणी भगवा फडकविला होता.
  • त्यामुळे वैभव नाईक यांच्याकडे जायंट किलर म्हणून पाहिले जात होते. त्यातच २०१९ च्या निवडणुकीत वैभव नाईक दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. असे असतानाही पक्षनेतृत्वाने नाईक यांना मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच केल्यासारखे होते.
  • मात्र, नाईक हे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान असल्याने त्यांनी बंडाचे निशाण रोवले नाही. 

जिल्हा बँकेत एकहाती सत्ता मिळविलीनारायण राणे यांच्या ३ नेतृत्वाखाली भाजपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला गेल्या तीन वर्षांत चांगले यश मिळवून दिले आहे. त्यात वेगवेगळ्या निवडणुकांसह राज्यात गाजलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही एकहाती सत्ता मिळविली. त्या निवडणुकीत नीतेश राणेंनी मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे राज्यातील भाजपामध्ये नीतेश राणेंनी एक वेगळी जागा निर्माण केली आहे.दीपक केसरकर नाराज, शिंदेंच्या संपर्कात ?

सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे युती शासनाच्या काळात म्हणजे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी पाच वर्षे सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम केले होते. २०१९ च्या निवडणुकीत ते शिवसेनेकडून दुसऱ्यांदा आमदार झाले. मात्र, ज्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी केसरकर यांना डावलण्यात आले. त्यामुळे केसरकर काही काळ नाराजदेखील होते.

आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजप ठरणार अव्वल

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत ४ समिती, ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी होण्याची शक्यता आहे. कारण भाजप सत्तेत आल्यास त्याचा फायदा सिंधुदुर्ग भाजपाला होणार आहे. त्यामुळे भाजपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली पाळेमुळे घट्ट करण्याची  यातून मोठी संधी निर्माण होणार आहे.

नीतेश राणेंना मिळणार संधीभाजपाची सत्ता आल्यास आमदारकीची दुसरी टर्म निवडून आलेल्या आणि भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांत नीतेश राणे यांनी आमदार म्हणून चांगले काम केले आहे. नीतेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणूनदेखील काम करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक रणनितीमध्येही नीतेश राणे यांना संधी देण्यात आली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा