शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताकेंद्र बदलाचे वारे, भाजप सत्तेत आल्यास नीतेश राणेंना मंत्रिपदाची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 11:50 IST

भाजपाची सत्ता आल्यास आमदारकीची दुसरी टर्म निवडून आलेल्या आणि भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविल्यानंतर भाजपकडून आता बदलासाठीच्या राज्यात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून आपल्यासमवेत ३० ते ३५ आमदारांना घेऊन भाजपाप्रणित गुजरात राज्यात आसरा घेतला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला असून शिंदे यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांमध्ये कोकणातील काही आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार नीतेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तसेच सत्ताबदल झाल्यास नीतेश राणे है सिंधुदुर्गचे पालकमंत्री होण्याची शक्यता राजकीय धुरिणांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यात विधानसभेचे तीन आमदार आहेत. यात कणकवली देवगड, वैभववाडी या मतदार संघातून भाजपाचे आमदार नीतेश राणे तर उर्वरित म्हणजे कुडाळ, मालवणसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या मतदार संघासाठी सेनेचे दीपक केसरकर हे आमदार आहेत. त्यामुळे सद्य राजकीय परिस्थितीचा विचार करता तीनपैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. तर एक भाजपचा.जिल्ह्यात सेनेचे दोन आमदार असतानाही या दोघांनाही बाजूला करत ठाकरे सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्रीदेखील करण्यात आले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत या राजकीय नाट्यावरून शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूरदेखील होता. मात्र, त्याला वाचा फोडण्यासाठी कोण पुढे येत नव्हते.वैभव नाईक जायंट किलर ठरूनही दुर्लक्ष

  • शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी २०१४ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कुडाळ-मालवण मतदार संघामद्ये सर्वप्रथम पराभव करत याठिकाणी भगवा फडकविला होता.
  • त्यामुळे वैभव नाईक यांच्याकडे जायंट किलर म्हणून पाहिले जात होते. त्यातच २०१९ च्या निवडणुकीत वैभव नाईक दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. असे असतानाही पक्षनेतृत्वाने नाईक यांना मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच केल्यासारखे होते.
  • मात्र, नाईक हे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान असल्याने त्यांनी बंडाचे निशाण रोवले नाही. 

जिल्हा बँकेत एकहाती सत्ता मिळविलीनारायण राणे यांच्या ३ नेतृत्वाखाली भाजपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला गेल्या तीन वर्षांत चांगले यश मिळवून दिले आहे. त्यात वेगवेगळ्या निवडणुकांसह राज्यात गाजलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही एकहाती सत्ता मिळविली. त्या निवडणुकीत नीतेश राणेंनी मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे राज्यातील भाजपामध्ये नीतेश राणेंनी एक वेगळी जागा निर्माण केली आहे.दीपक केसरकर नाराज, शिंदेंच्या संपर्कात ?

सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे युती शासनाच्या काळात म्हणजे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी पाच वर्षे सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम केले होते. २०१९ च्या निवडणुकीत ते शिवसेनेकडून दुसऱ्यांदा आमदार झाले. मात्र, ज्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी केसरकर यांना डावलण्यात आले. त्यामुळे केसरकर काही काळ नाराजदेखील होते.

आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजप ठरणार अव्वल

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत ४ समिती, ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी होण्याची शक्यता आहे. कारण भाजप सत्तेत आल्यास त्याचा फायदा सिंधुदुर्ग भाजपाला होणार आहे. त्यामुळे भाजपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली पाळेमुळे घट्ट करण्याची  यातून मोठी संधी निर्माण होणार आहे.

नीतेश राणेंना मिळणार संधीभाजपाची सत्ता आल्यास आमदारकीची दुसरी टर्म निवडून आलेल्या आणि भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांत नीतेश राणे यांनी आमदार म्हणून चांगले काम केले आहे. नीतेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणूनदेखील काम करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक रणनितीमध्येही नीतेश राणे यांना संधी देण्यात आली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा