शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हात सरसावले---चिपळुणातही स्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 16, 2014 23:55 IST

धर्माधिकारी प्रतिष्ठान : शिस्तबध्द, प्रामाणिक मोहिमेचे कौतुक

रत्नागिरी : देशभरात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ मोहिमेंतर्गत रत्नागिरी शहरातही ‘स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी’ मोहीम १४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज (रविवार) नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अडीच हजार अनुयायांनी संपूर्ण शहरात अप्रतिम स्वच्छता मोहीम राबविली. शहरातील प्रत्येक गल्ली-गल्लीत जाऊन या प्रतिष्ठानच्या अनुयायांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या व प्रामाणिकपणे स्वच्छता मोहीम राबविली. त्यात कोठेही दिखावूपणा नव्हता, अशा प्रतिक्रिया रत्नागिरीवासियांतून व्यक्त करण्यात आल्या. सकाळी ७ वाजल्यापासून या मोहिमेला प्रतिष्ठानच्या अनुयायांनी प्रारंभ केला. त्यांनी संकलित केलेला कचरा घेण्यासाठी पालिकेच्या कचरा गाड्या कार्यरत होत्या. शहरातील साळवी स्टॉप ते मिरकरवाडापर्यंत मुख्य रस्त्याची संपूर्ण झाडलोट करण्यात आली. गटाराच्या बाजूला साचलेला कचरा, पिशव्या, डबरही गोणपाटात भरून तो कचरा गाड्यांमध्ये ओतला जात होता. प्रतिष्ठानच्या अनुयायांनी वेगवेगळे गट केले होते. या कार्यकर्त्यांची शिस्तबध्दता हा शहरवासियात चचेचा विषय होता. शहराच्या मुख्य रस्त्याबरोबरच शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांच्या बाजुलाही असलेला मोठ्या प्रमाणातील कचरा, डबर तसेच वाढलेली झुडुपेही तोडून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ केला. पालिकेचे सफाई कामगारही त्यांना सहकार्य करीत होते. (प्रतिनिधी)चिपळुणातही स्वच्छता मोहीमचिपळूण : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने आज रविवारी चिपळूण शहर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. वर्षानुवर्षे वाशिष्ठी नदीकिनारी साचलेला गाळ व कचरा या मोहिमेअंतर्गत जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात आला. रविवारी सकाळी ७ वाजता बहादूरशेख नाका येथून या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. गांधीनगर, बहादूरशेख नाका, खेर्डी, गुहागर बायपास, भोगाळे, चिंचनाका, मार्कंडी, बाजारपेठ, तलाठी कार्यालय, खेंड, पेठमाप, उक्ताड, विश्रामगृह ते हायवे दुतर्फा रस्त्याचीही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेचे वैशिष्ठ्य म्हणजे वर्षानुवर्ष वाशिष्ठी नदीत साचलेला गाळ व कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, आगवे, अलोरे, सती, कापसाळ, पाचाड येथील कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेवून शहर व परिसर स्वच्छ केला. वाशिष्ठी नदीतील गाळ अंदाजे ७० हून अधिक डंपर भरुन उचलण्यात आला. त्यामुळे नदी परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सीमा चव्हाण, नगरसेवक इनायत मुकादम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रताप शिंदे, आरोग्य निरीक्षक अनंत हळदे, अशोक साठे यांनीही या मोहिमेत सहभाग दर्शविला आज रविवारी सुट्टीचा दिवस असताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहकार्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभर राबविण्यात येत आहे. शहरामध्ये ३० जणांचा एक गट तयार करण्यात आला होता. या गटाच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. (वार्ताहर)