शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

उद्धव ठाकरे यांनी किती कडवट शिवसैनिकांना पदे दिली, नितेश राणे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 12:13 IST

कणकवली : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवर बाहेरून आलेल्यांना पद देता, असा आरोप करतानाच संजय राऊत मुक्ताफळे उधळत आहेत. मग, उद्धव ठाकरे ...

कणकवली : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवर बाहेरून आलेल्यांना पद देता, असा आरोप करतानाच संजय राऊत मुक्ताफळे उधळत आहेत. मग, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती कडवट शिवसैनिकांना त्यांनी पदे दिली होती? जेव्हा खासदारकी, आमदारकी, सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद द्यायची वेळ आली, तेव्हा निष्ठावंत शिवसैनिकांची कुटुंबे त्यांना आठवली नाहीत. तेव्हा बाहेरचे लोकच त्या पदांवर बसवले. आता संजय राऊत जे बोलतात ते कोणत्या तोंडाने बोलत आहेत? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.कणकवली येथे रविवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचे दुकान आता बंद झाले आहे. हे त्यांच्या सहकाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे सगळे भाजपात प्रवेश करत आहेत.

पक्ष संपलेल्यांनी भाजपाला संपवण्याची भाषा करू नयेप्रकाश आंबेडकर यांनी ‘मातोश्री’वर फोन लावला तेव्हा उद्धव ठाकरेंनी फोन घेतला नाही. त्यांचा अपमान केला, अशी आमच्याजवळ माहिती आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना तासनतास बसवून ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब या लोकांना महत्त्वाचे वाटत नाही. त्यांचा हे नेहमी अपमान करत आहेत. ठाकरे सेना शरद पवारांची बी टीम झाली आहे. अशा पक्ष संपलेल्यांनी भाजपाला संपवण्याची भाषा करू नये.भाजपा ही भारताची ओळख झाली आहे. भारताचा अभिमान टिकवून ठेवणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजपा आहे. जे चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांच्या पक्षात डावलले जात असेल तर त्यांना मानसन्मान मिळण्यासाठी त्यांनी भाजपात यावे, असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असेल तर ते योग्यच आहे.

पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जावेपोलिसांच्या पत्नी या आमच्या भगिनी आहेत. त्यांना मी खुले पत्र लिहीन, ते वाचल्यानंतर त्यांचे मत नक्कीच बदलेल, असे एका प्रश्नावर नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले, जिल्ह्यात सापडलेले बांगलादेशी इथे आले कसे? त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम पोलिसांनी करावे. पोलिसांनी बांगलादेशी, रोहिंगे यांना पकडले. ही कारवाई त्यांनी केली. त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, या घटनेच्या मुळाशी जावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना