शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वैभववाडीत मुसळधार पाऊस, नाधवडेत झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:15 AM

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाचा वैभववाडीच्या आठवडा बाजाराला चांगलाच फटका बसला. बाजारातील भाजी, कापड, व शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे या पावसामुळे नुकसान झाले.या पावसाचा घाटमार्गांवर परिणाम झालेला नाही. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने सायंकाळी वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

ठळक मुद्देवैभववाडीत मुसळधार पाऊस, नाधवडेत झाड कोसळलेआठवडा बाजारातील व्यापाऱ्यांना फटका; घाटमार्ग सुरळीत

वैभववाडी : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाचा वैभववाडीच्या आठवडा बाजाराला चांगलाच फटका बसला. बाजारातील भाजी, कापड, व शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे या पावसामुळे नुकसान झाले.या पावसाचा घाटमार्गांवर परिणाम झालेला नाही. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने सायंकाळी वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.मृग नक्षत्र सुरू झाल्यावर २ ते ३ दिवसांनी समाधानकारक पाऊस झाल्याने भात पेरणी उरकण्यात आली. परंतु, पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. पेरणी होऊन आठवडा मागे पडला तरी पाऊस परतला नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय? अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.मात्र, मंगळवारी सायंकाळी हा पाऊस परतला. परंतु, त्यामध्ये जोर नव्हता. बुधवारी सकाळी पाऊस जोर धरण्याची चिन्हे दिसत होती. त्याप्रमाणे सकाळच्या सत्रात २ ते ३ मोठ्या सरी कोसळल्या. दुपारी तीननंतर मुसळधार पावसाला सुरुवात होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावरील पावसाचे पाणी काही प्रमाणात दुकानांमध्ये घुसल्यामुळे भाजी, कपडे व्यापाऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.जिल्ह्यात सरासरी ११.३७ मिलीमीटर पाऊससिंधुदुर्गात गेल्या चोवीस तासात सरासरी ११.३७ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाची आहे. दोडामार्ग ३४ (१९७), सावंतवाडी ०३ (११८), वेंगुर्ले ०१ (१३२), कुडाळ ०९ (१९४), मालवण ०१ (१३३), कणकवली २३ (२०२), देवगड ०३ (१२५), वैभववाडी १७ (१८२) पाऊस झाला आहे.विजांचा कडकडाटपावसादरम्यान विजांचा कडकडाटही सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे बहुतांश नद्या-नाले रात्रीपर्यंत प्रवाहित होण्याची शक्यता आहे. करूळ आणि भुईबावडा दोन्ही घाटमार्ग सुरळीत होते. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वेळाने एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर रस्त्यावरील झाड हटविण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग