शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Sindhudurg: दोडामार्गला वळवाचा तीन तास तडाखा, शेतीपिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:48 IST

उकाड्याने हैराण जिवांना दिलासा !

दोडामार्ग : एकीकडे वैशाख वणव्याने समस्त दोडामार्गकर होरपळून निघाले असताना गुरुवारी अचानकपणे धुवाधार कोसळलेल्या वळीवाच्या पावसाने दिलासा दिला. जवळपास तीन तासांहून अधिक काळ बरसलेल्या या वरुणराजाने व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांची धांदल उडवून दिली. उकाड्याला वैतागलेल्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात कमालीचा उष्मा जाणवू लागला होता. उष्णतेचा पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला होता. वैशाख वणव्यामुळे प्राणी पक्षांपासून ते मानवजातीपर्यंत सगळेचजण होरपळून निघाले होते. सगळ्यांच्याच अंगाची लाही-लाही होत होती. त्यामुळे त्यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण थंड पण्यात डुंबून राहण्यासाठी नदीकिनाऱ्यांचा आसरा शोधत होते. अशा परिस्थितीत गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वळीवाच्या पावसाने हजेरी लावून उकाड्याने हैराण झालेल्यांना सुखद धक्का दिला.दुपारी १ वाजता सुरू झालेला पाऊस ४ वाजता थांबला. जवळपास तीन तास पाऊस कोसळत होता. त्यामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला. या पावसामुळे शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. शेतकऱ्यांच्या कोकम, मिरची, आंबा, केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले.

वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट वळीवाच्या पहिल्याच पावसात वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्यावर विजेची बत्ती गूल झाली. पाऊस थांबल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस