शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

Sindhudurg: दोडामार्गला वळवाचा तीन तास तडाखा, शेतीपिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:48 IST

उकाड्याने हैराण जिवांना दिलासा !

दोडामार्ग : एकीकडे वैशाख वणव्याने समस्त दोडामार्गकर होरपळून निघाले असताना गुरुवारी अचानकपणे धुवाधार कोसळलेल्या वळीवाच्या पावसाने दिलासा दिला. जवळपास तीन तासांहून अधिक काळ बरसलेल्या या वरुणराजाने व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांची धांदल उडवून दिली. उकाड्याला वैतागलेल्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात कमालीचा उष्मा जाणवू लागला होता. उष्णतेचा पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला होता. वैशाख वणव्यामुळे प्राणी पक्षांपासून ते मानवजातीपर्यंत सगळेचजण होरपळून निघाले होते. सगळ्यांच्याच अंगाची लाही-लाही होत होती. त्यामुळे त्यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण थंड पण्यात डुंबून राहण्यासाठी नदीकिनाऱ्यांचा आसरा शोधत होते. अशा परिस्थितीत गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वळीवाच्या पावसाने हजेरी लावून उकाड्याने हैराण झालेल्यांना सुखद धक्का दिला.दुपारी १ वाजता सुरू झालेला पाऊस ४ वाजता थांबला. जवळपास तीन तास पाऊस कोसळत होता. त्यामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला. या पावसामुळे शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. शेतकऱ्यांच्या कोकम, मिरची, आंबा, केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले.

वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट वळीवाच्या पहिल्याच पावसात वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्यावर विजेची बत्ती गूल झाली. पाऊस थांबल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस