शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

बळींची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घ्यावी : लॅब असती तर प्रादुर्भाव थांबला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 2:43 PM

कणकवली : सिंधुदुर्गात नऊ महिन्यांपूर्वीच कोरोना चाचणी प्रयोगशाळेची मशिनरी आली आहे. त्यामुळे उर्वरित साहित्याची जुळवाजुळव करून कोविड चाचणी प्रयोगशाळा ...

ठळक मुद्देप्रमोद जठार यांची टीका अन्यथा जनतेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करू,

कणकवली : सिंधुदुर्गात नऊ महिन्यांपूर्वीच कोरोना चाचणी प्रयोगशाळेची मशिनरी आली आहे. त्यामुळे उर्वरित साहित्याची जुळवाजुळव करून कोविड चाचणी प्रयोगशाळा लगेचच सुरू करता आली असती. तसेच कोरोनामुळे देवगडच्या महिलेचा बळीदेखील गेला नसता.

त्यामुळे या कोरोना बळीची जबाबदारी विनाकारण राजकारण करीत बसलेल्या पालकमंत्र्यांनी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये , नगरसेवक शिशिर परुळेकर, अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.

प्रमोद जठार म्हणाले, जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली असती तर चाकरमान्यांची तातडीने चाचणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देता आला असता. यात कोरोना बाधितांचीही संख्या मर्यादित राहिली असती. मात्र, सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी राजकारण करून इथल्या जनतेला मरणाच्या दारात आणून उभे केले आहे. कोरोना चाचणीसाठी असणारी मशिनरी जिल्हा रुग्णालयात आहे हे त्यांना माहीत होते. पण ते टोलवाटोलवी करीत राहिले. यामुळे देवगड तालुक्यातील मृत झालेल्या त्या महिलेचा स्वॅब चाचणी अहवाल आठ दिवसांनी पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत तिच्या संपर्कातील अनेकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्याच्या अन्य भागातही अशीच परिस्थिती आहे. कोरोनाचे चाचणी अहवाल येण्यास चार ते आठ दिवस लागतात. तोपर्यंत त्या व्यक्तीच्या संपर्कात अनेक जण येतात. श्रेयवादाच्या राजकारणापेक्षा आज सिंधुदुर्गातील जनतेचे जीव वाचणे महत्त्वाचे आहे. पण पालकमंत्री कोरोना चाचणी मशिन सुरू करण्याऐवजी रत्नागिरीत विद्युतदाहिनी उभी करण्यात गुंतले आहेत. ते काम एवढे महत्त्वाचे आहे का? सामंत केवळ नावापुरतेच पालकमंत्री आहेत.

आमदार वैभव नाईक यांनी कोरोना चाचणीसाठीच्या प्रयोगशाळेच्या मंजुरीचे पत्र आणले. त्यांचे मी अभिनंदन करतो. पण त्यामुळे सामंत हे उपरे असल्याचे सिद्ध झाले आहे.कामाला लागा, अन्यथा गुन्हे दाखल करू पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये ही प्रयोगशाळा उभारायची नसेल उभारू नका. तुम्हांला वाटेल तिथे उभारा . मात्र, कामाला तत्काळ सुरवात करा. जनतेचे प्राण वाचवा. अन्यथा जनतेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करू, असेही यावेळी प्रमोद जठार म्हणाले.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंतcorona virusकोरोना वायरस बातम्या