शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा पैसा मनमानीपणाने खर्चकृषी समिती सभेत आरोप : सविस्तर अहवाल देण्याचे सभापतींचे आदेश

By admin | Updated: July 23, 2014 21:55 IST

लोकप्रतिनिधी अनभिज्ञ

सिंधुदुर्गनगरी : फळपिक विमा योजनेबाबत शेतकरी आणि लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याने या योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. कृषी सहाय्यक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शासनाकडून येणारा पैसा मनमानीपणे खर्च केला जात असल्याचा आरोप सदस्यांनी कृषी समिती सभेत केला. तर गेल्या पाच वर्षात कृषी अधीक्षक कार्यालयाकडून राबविलेल्या योजना, बांधलेले बंधारे आणि त्यापासून शेतकऱ्यांना झालेला फायदा यांचा सविस्तर अहवाल पुढील सभेत द्यावा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती संदेश सावंत यांनी दिले.जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य नासीर काझी, विभावरी खोत, गुरूनाथ पेडणेकर, रत्नप्रभा वळंजु, सचिव तथा कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत खर्च होणारा पैसा हा त्यांच्या मर्जीने वाटेल तिथे खर्च केला जात आहे. जेथे आवश्यक आहे शेतकऱ्यांची मागणी आहे, अशा ठिकाणी निधी खर्च होत नाही. केलेल्या कामाचा जनतेला किती फायदा झाला याचा लेखाजोखा दिला जात नाही. लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही. कोणतीही माहिती मागूनसुद्धा मिळत नाही, असा आरोप सदस्यांनी सभेत केला तर सभापती संदेश सावंत यांनी गेल्या पाच वर्षात अधीक्षक कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेले बंधारे आणि त्या बंधाऱ्यांमुळे किती शेतकऱ्यांना फायदा झाला. याबाबतची सविस्तर अहवाल पुढील सभेत द्या, असे आदेश सभापती संदेश सावंत यांनी दिले. तसेच फळपिक विमा योजनेची माहिती शेतकरी आणि लोकप्रतिनिधीपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून अद्यापही वंचित आहेत. कृषी सहाय्यक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शासनाकडून येणारा पैसा मनमानीपणे वाटेल तिथे खर्च केला जात असल्याचा आरोप करीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असे आदेश सभापती संदेश सावंत यांनी सभेत दिले. चालूवर्षी जिल्ह्यात महाबिजचे १३७७ क्विंटल व खासगी कंपन्यांचे २९२७ क्ंिवटल असे एकूण ४३०४ क्विंटल भात बियाणे यावर्षी पुरविण्यात आले आहे. तर १४१७८ मे. टन खत उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे कुठेही खताचा तुटवडा नाही, अशी माहिती सभेत देण्यात आली.जिल्ह्यात चालूवर्षी ११०० बायोगॅसचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३३९ बायोगॅस पूर्ण झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली. तसेच यावर्षी खरेदी-विक्री संघाकडून मोठ्या प्रमाणात भात खरेदी केली आहे. ७५ टक्के गोदामे भरली आहेत. मात्र अद्याप शासनाकडून या भाताची उचल न झाल्याने खरेदी-विक्री संघ अडचणीत सापडले आहेत. तर काही ठिकाणी गोदामामध्ये गळती असल्याने भात भिजून नुकसान होत आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली.मर्जीतील शेतकऱ्यांनाच लाभशेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ देताना काही कृषी सहाय्यक हे आपल्या मर्जीतील ठराविक शेतकऱ्यांनाच लाभ देतात. गरजू शेतकऱ्यांना योजनांची माहिती दिली जात नाही. लाभापासून वंचित ठेवले जाते. केवळ आलेले पैसे खर्च करण्याच्यादृष्टीने त्यांचे काम मर्यादीत आहे. कृषी क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही, असा आरोप सदस्यांनी केला. (प्रतिनिधी)