शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कासार्डेजवळ अपघातात मुलीसह आईवडील जागीच ठार

By admin | Updated: September 5, 2014 23:27 IST

खासगी आरामबस-कारची समोरासमोर धडक : भरणीतील पाडावे कुटुंबावर काळाचा घाला; कारचा चक्काचूर

नांदगाव, तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडीनजीक आज, शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास व्हॅगनर कार व खासगी आरामबस यांच्यात समोरासमोर धडक होऊन कणकवली तालुक्यातील भरणी येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. गणेश पाडावे (वय ३८, मूळ गाव भरणी, ता. कणकवली, सध्या रा. जोगेश्वरी), पत्नी सायली पाडावे (३५) व मुलगी वेदश्री पाडावे (११) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की, व्हॅगनर गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भरणी येथून मुंबईकडे व्हॅगनर कार (एमएच ०२ बीजी ७४०६) गणेश शामसुंदर पाडावे, तर मुंबईकडून कणकवलीकडे खासगी आरामबस (एमएच ०४ पीके ७५५६) सचिन विष्णू माने (रा. सातारा) हे घेऊन जात होते. त्यांच्यात महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणदेव जवळील मेढादेव या ठिकाणच्या वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर व्हॅगनरमधील सायली पाडावे या बाहेर फेकल्या गेल्याने त्यांना जोरात मार बसला, तर गणेश पाडावे व वेदश्री पाडावे गाडीतच अडकून / ाडल्याने जागीच मृत झाले. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने कासार्डे, तळेरे व नांदगावच्या ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर महामार्गावर सुमारे दीड तास एकेरी वाहतूक सुरू होती. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. व्हॅगनर गाडी पूर्णपणे तोडून अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रोहन रानमाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, कासार्डेचे आत्माराम गोसावी, चंद्रकांत झोरे, विजय खरात, तसेच आमदार प्रमोद जठार, पंचायत समितीचे सदस्य संजय देसाई, कासार्डेचे सरपंच संतोष पारकर, रज्जाक बटवाले यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ मदत केली. याठिकाणी सिंधुभूमी फाऊंडेशन कासार्डे, बाळा वळंजू मित्रमंडळ वारगाव, नांदगाव व फणसगाव येथील रुग्णवाहिका तात्काळ आल्या. (वार्ताहर)...तर त्या वाचल्या असत्याव्हॅगनरमधून बाहेर फेकल्या गेलेल्या सायली पाडावे यांना तत्काळ इमर्जन्सी १०८ रुग्णवाहिकेची मदत मिळाली असती, तर त्या कदाचित वाचल्या असत्या, असे उपस्थितांमधून बोलले जात होते. मात्र, १०८ ही रुग्णवाहिका इतर ठिकाणी गेल्याने तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.कुटुंबच उद्ध्वस्त झालेकणकवली तालुक्यातील भरणी (घाडीवाडी) येथील पाडावे हे कामानिमित्त जोगेश्वरी येथे राहायला होते. काल, गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करून आज पुन्हा मुंबईला जायला निघाले असता कासार्डे येथे त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि पाडावे कुटुंबच उद्ध्वस्त झाले. त्यांच्या पश्चात आई व भाऊ आहे.