शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

मासळीचे दर कडाडले, वादळी वाऱ्यांचा फटका : मत्स्य व्यवसायावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:08 AM

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका सहन करावा लागला. पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात किरकोळ मासळीच मिळत असल्याने स्थानिक मच्छी मार्केटमध्ये मासळीचे दरही कडाडले आहेत. त्यामुळे मत्स्य खवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

ठळक मुद्देमासळीचे दर कडाडले, वादळी वाऱ्यांचा फटका मत्स्य व्यवसायावर परिणाम

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका सहन करावा लागला. पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात किरकोळ मासळीच मिळत असल्याने स्थानिक मच्छी मार्केटमध्ये मासळीचे दरही कडाडले आहेत. त्यामुळे मत्स्य खवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.कोकण किनारपट्टी भागात रात्रीच्यावेळेस होणाऱ्या पर्ससीन, एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे गेले तीन-चार महिने स्थानिक मच्छिमारांना मासळी मिळणेच कठीण बनले होते. मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात इंधनावर खर्च होत असताना मासळीपासून म्हणावे तसे उत्पन्नच मिळत नसल्याने अनेक मच्छिमारांनी नौका समुद्रातच उभ्या केल्याचे चित्र दिसून आले.

गेल्या काही दिवसांत स्थानिक मच्छिमारांना मुबलक किमती मासळी उपलब्ध होत होती. मात्र अचानक वादळी वाऱ्यामुळे समुद्रातील वातावरणात बदल होऊन त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्य खवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. बुधवारी या वाऱ्याचा जोर काहीसा कमी झाल्याचे मच्छिमारांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही दिवसांत चांगली मासळी मिळेल, अशी अपेक्षा मच्छिमारांमधून व्यक्त केली जात आहे.मत्स्य खवय्ये नाराजसध्या पर्यटन हंगाम तसेच सुटीचा कालावधी असल्याने मुंबईकर चाकरमानी, पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. यात किमती मासळीच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील मत्स्याहारी थाळ्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मत्स्य खवय्यांकडून सुरमई, पापलेट, बांगडा आदी मासळीला पसंती असल्याने त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे मत्स्य खवय्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग