शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:33 PM

Tauktae Cyclone Sindhudurg : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.

ठळक मुद्देसंसार उद्ध्वस्त झाल्याने डोळे पाणावले ! कणकवली तालुक्यात तौक्ते वादळाने मोठे नुकसान

सुधीर राणेकणकवली : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. कोरोनाच्या फटक्याने अनेक ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच वादळाने झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावत आहेत.तौक्ते वादळाने कणकवली तालुक्यात धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वानाच हैराण करून सोडले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. सह्याद्री पट्ट्यातील गावांमधिल अनेक घरांची छपरे पत्याप्रमाणे उडून गेली. नारळ, आंबा, काजू यांची झाडे उन्मळून पडली तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. हापूस आंब्याचेही नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या चक्रीवादळात फळ बागांचे नुकसान झाल्याने हिरावून घेतला गेला आहे.घरांच्या छपरांची कौले, सिमेंटचे व लोखंडी पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गुरांच्या गोठयांचीही हानी झाली आहे. विजेच्या खांबांवर झाडे तुटून पडल्याने अनेक खांब मोडून पडले होते. तर अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याने वीज प्रवाह खंडीत झाला होता. अकरा दिवसांच्या विशेष प्रयत्नातून महावितरणला वीज प्रवाह सुरळीत करण्यात यश आले आहे.या वादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान झालेल्याना भरघोस भरपाई देण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी लावून धरली आहे. ग्रामसेवक, तलाठी , कोतवाल, पोलीस पाटील , मंडळ अधिकारी आदी महसुलचे कर्मचारी यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करून पंचयादी घातली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे.खासदार, आमदार, पालकमंत्री व अन्य नेत्यांनी तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मात्र, शासनाकडून जाहीर झालेली नुकसान भरपाई प्रत्यक्षात कधी मिळणार ? याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकसान भरपाईची ते अगदी चातका प्रमाणे वाट बघत असल्याचे सध्याचे चित्र आहे.घरांची डागडुजी करण्यासाठी अनेकाना आर्थिक मदतीची गरज असून आता कर्जासाठी बँकांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे काही नुकसानग्रस्तांनी सांगितले. सरकारची मदत मिळेपर्यंत आमचे घर नादुरुस्त स्थितीत ठेवू शकत नाही. पावसाळा जवळ आल्याने त्याची त्वरित डागडुजी करणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले.निसर्गाच्या या दणक्याने शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. कणकवली तालुक्‍यातील नुकसानीचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहचला आहे. मात्र, सरकारकडून नुकसान भरपाई मिळताना शेतकऱ्यांना अनेक प्रशासकीय अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्या सोबत जमिनीचा सातबारा व अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.त्यामुळे ते चिंतीत आहेत. तालुक्यातील साकेडी, कलमठ, भिरवंडे,नाटळ, नरडवे,वाघेरी,फोंडाघाट आदी परिसरात झालेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तराळत आहेत.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग