शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अतिउत्साह ठरतोय जीवघेणा

By admin | Updated: July 21, 2015 00:55 IST

मद्यपी पर्यटकांना आळा घाला : शासनाने सुरक्षेच्यादृष्टीने गांभिर्याने घेणे गरजेचे

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण सागरी पर्यटनाचा विचार करता तारकर्ली व देवबाग जगाच्या कानावर कानाकोपऱ्यात पोहोचले. येथील स्वच्छ व मनमोहक समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र अलिकडील काळात अतिउत्साही पर्यटकांचा उत्साह त्यांच्या जीवावर बेततो आहे. गेल्या काही वर्षात पर्यटकांचे हॉटस्पॉट असलेल्या या समुद्रकिनाऱ्यांवर बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्षच दिसून येते. तारकर्ली-देवबाग किनारी समुद्रात आजतागायत अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना घडल्यास प्रत्येकवेळी जीवरक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र यावर शासनस्तरावरून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. पर्यटकांच्या मृत्यूस त्यांचा अतिउत्साहीपणा कारणीभूत असला तरी शासनाने पर्यटन हे विकासाचे माध्यम म्हणून पाहताना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखणे आवश्यक आहे. पावसाळी हंगामात समुद्रात मासेमारी व पर्यटन व्यवसाय करण्याची शासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधीचे निर्देश आहेत. असे असताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून मच्छिमार किवा अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून समुद्रात उतरतात. अतिउत्साही पर्यटकांमध्ये सूचनांचे पालन न करता आपल्या मर्जीनुसार काहीजण समुद्रात उतरून मौजमस्ती करतात. पावसाळी हंगामात समुद्री लाटा उसळत्या आणि वेगात असतात. लाटांच्या तडाख्यात सापडल्यास मृत्यूचे दर ठोठावे लागते. याची प्रचिती गेली कित्येक वर्षे येत आहे. पर्यटक हे एक किंवा दोन दिवसांच्या टूरवर आलेले असतात. मालवण, तारकर्लीसारख्या नयनरम्य ठिकाणी वर्षा सहली आयोजित केलेल्या असतात. स्वच्छ किनाऱ्यांची सर्वांनाच भुरळ पडते. जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण असते. केव्हा एकदा पाण्यात उतरतो याची उत्सुकता असते. तारकर्ली समुद्र किनारा ‘डेंजर झोन’ आहे. पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेता घेता समुद्रात हळूहळू आत जाऊ लागतात. याची त्यांना कल्पनाही येत नाही. आणि दुर्दैवाने एखाद्या भयंकर लाटांचा तडाखा सोसावा लागतो अन प्राणही गमवावे लागतात.