शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

खावटी कर्जमाफी रक्कम मिळणार कधी...?,जाहीर करून उलटले अनेक महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:26 PM

शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर करून व त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करून अनेक महिने उलटले तरी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखावटी कर्जमाफी रक्कम मिळणार कधी...?,जाहीर करून उलटले अनेक महिनेसिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६९४ शेतकरी लाभास पात्र

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर केली आहे.त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ हजार ६९४ शेतकरी पात्र ठरले असून त्यांनी ऑनलाईन अर्ज शासनाला सादर केलेले आहेत.

प्रत्यक्षात शासनाने खावटी कर्जमाफी जाहीर करून व त्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करून अनेक महिने उलटले तरी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये मोठ्या स्वरूपाची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती. त्यातही परतफेड करणारे जास्त होते. मात्र, शेतीपूरक छोट्या व्यवसायासाठी खावटी कर्ज घेणारे शेतकरी या जिल्ह्यात जास्त आहेत.

हे कर्ज जिल्हा बँकेने पतसंस्थानच्या माध्यमातून जिल्हा बँकेने पुरविले होते. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शासनाने खावटी कर्ज माफ करावे, अशी मागणी लावून धरली होती.त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासनाने काही महिने अगोदर सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यासाठी खावटी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानुसार खावटी कर्जदार शेतकरी यांच्याकडून ऑनलाईन अर्ज शासनाने मागवून घेतले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाप्रकारे कर्ज घेतलेले शेतकरी १० हजार ५२१ आहेत. त्यासाठी १६ कोटी २२ लाख ७८ हजार एवढा निधी लागणार होता. तर २२६ पतसंस्थानी हे कर्ज पुरविले होते. मात्र, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या तपासणीत १९२ पतसंस्था कर्जमाफिस पात्र ठरल्या आहेत. या पतसंस्थानी पुरविलेल्या खावटी कर्जातील ९ हजार ६९४ शेतकरी लाभास पात्र ठरले असून त्यासाठी १३ कोटी ३७ लाख एवढी रक्कम अपेक्षित आहे.

या सर्व शेतकरी बंधूनी लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यानंतर अनेक महिन्याचा कालावधी लोटला. लोकसभा निवडणूक आचार संहितेनंतर हि रक्कम खात्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शासनाकडून याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे नेमकी खावटी कर्जमाफी मिळणार कि नाही ? असा संभ्रम संबंधित लाभार्थी शेतकरी यांच्यात निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग