शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबर विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:10 IST

''त्याची 'त्यांना' आठवण करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावर''

कणकवली : सिंधुदुर्गसह कोकणचा विकास सर्वांना एकत्रित घेवून करायचा आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी  मत्स्य तसेच बंदर ही दोन्ही खाती यापूर्वी सांभाळली आहेत. त्यांच्या तसेच माझ्या अन्य सहकारी आजी व माजी आमदारांच्या अनुभवावर मोठे काम करून दाखवायचे आहे. हे खातं सांगाळताना किनारपट्टीचे संरक्षण तसेच विकास याचाही विचार करायचा आहे. येथील दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे, असे सूतोवाच मत्स्य व बंदर  विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.खारेपाटण येथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले,नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा प्रवास मत्स्य खात्यातून सुरू झाला होता. त्यांनी बंदर खातं पण सांगाळलं होतं. आमच्यासोबत असलेले रविंद्र चव्हाण यांनाही चांगला अनुभव आहे. दीपक केसरकरही आहेत, आमदार नीलेश राणे, माजी आमदार गोगटे माझ्यासोबत आहेत. या सर्वांचा बलाढ्य अनुभव माझ्याकडे आहे. त्या अनुभवावर जनतेचा  विकास साधायचा आहे.पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हा माझा प्रश्न नाही, वरिष्ठ देणार ती जबाबदारी मला पार पाडायची आहे. कोकणातील आंबा, काजू, सुपारी, मासे यावर मोठे अर्थकारण अवलंबून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बारकाईने विचार करून मला या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे.  कुठल्याही पद्धतीचा सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून कोकण किनारपट्टीवर हल्ला होऊ नये, याची काळजी घ्यायची आहे.२६/११ चा हल्ला समुद्राच्या माध्यमातून झाला होता. असे काही राष्ट्रविरोधी विचाराचे लोक राहतात, त्यांच्यावर बारकाईने लक्ष राहील. सागरी सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे. किनारपट्टीवरील सीआरझेड, अतिक्रमणे आहेत, ती धोक्याची ठरू शकतात. गेल्याच महिन्यात रत्नागिरीत अतिरेकी संघटनेशी निगडीत काहीजणाना अटक झाली. ते किनारपट्टीवर राहत होते. अशांवर बारीक नजर राहणार आहे. स्थलांतरीत तरुण रोजगारासाठी थांबला पाहिजे, असे काम इथे करायचायकोकणातील तरुण वसई, विरार, नालासोपारा आदी भागात रोजगारासाठी जात होता. हा स्थलांतरीत होणारा तरुण येथेच रोजगारासाठी थांबला पाहिजे, असे काम इथे करायचे आहे. देवगडचा आमदार कधी मंत्री होत नाही. तो नेहमी विरोधी पक्षात बसणार, असा आरोप, टीका केली जात असे. मात्र,आता माझ्या रुपाने एक उदाहरण मिळाले आहे. यापुढे कधीही असा ठपका ठेवला जाणार नाही. 'राणे संपले' म्हणाऱ्यांना उत्तर मिळाले 'राणे संपले' अशी टीका करणाऱ्या विरोधकांना आता त्याचे उत्तर मिळाले असेल. विरोधकांनी दहा वर्षे मला खूप अनुभव दिले आहेत. ते सत्तेत असताना विरोधक म्हणून माझ्याशी कसे वागले, त्याची त्यांना आठवण करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आज माझ्या होणाऱ्या स्वागताचा क्षण कार्यकर्त्यांमुळे अनुभवायला मिळाला. कार्यकर्ते सोबत राहिले. त्यामुळे त्यांचा हट्ट पुरवणं हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या मनाप्रमाणे स्वागत स्वीकारत आहे. असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sea Routeसागरी महामार्ग