शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबर विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:10 IST

''त्याची 'त्यांना' आठवण करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावर''

कणकवली : सिंधुदुर्गसह कोकणचा विकास सर्वांना एकत्रित घेवून करायचा आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी  मत्स्य तसेच बंदर ही दोन्ही खाती यापूर्वी सांभाळली आहेत. त्यांच्या तसेच माझ्या अन्य सहकारी आजी व माजी आमदारांच्या अनुभवावर मोठे काम करून दाखवायचे आहे. हे खातं सांगाळताना किनारपट्टीचे संरक्षण तसेच विकास याचाही विचार करायचा आहे. येथील दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे, असे सूतोवाच मत्स्य व बंदर  विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.खारेपाटण येथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले,नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा प्रवास मत्स्य खात्यातून सुरू झाला होता. त्यांनी बंदर खातं पण सांगाळलं होतं. आमच्यासोबत असलेले रविंद्र चव्हाण यांनाही चांगला अनुभव आहे. दीपक केसरकरही आहेत, आमदार नीलेश राणे, माजी आमदार गोगटे माझ्यासोबत आहेत. या सर्वांचा बलाढ्य अनुभव माझ्याकडे आहे. त्या अनुभवावर जनतेचा  विकास साधायचा आहे.पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हा माझा प्रश्न नाही, वरिष्ठ देणार ती जबाबदारी मला पार पाडायची आहे. कोकणातील आंबा, काजू, सुपारी, मासे यावर मोठे अर्थकारण अवलंबून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बारकाईने विचार करून मला या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे.  कुठल्याही पद्धतीचा सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून कोकण किनारपट्टीवर हल्ला होऊ नये, याची काळजी घ्यायची आहे.२६/११ चा हल्ला समुद्राच्या माध्यमातून झाला होता. असे काही राष्ट्रविरोधी विचाराचे लोक राहतात, त्यांच्यावर बारकाईने लक्ष राहील. सागरी सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे. किनारपट्टीवरील सीआरझेड, अतिक्रमणे आहेत, ती धोक्याची ठरू शकतात. गेल्याच महिन्यात रत्नागिरीत अतिरेकी संघटनेशी निगडीत काहीजणाना अटक झाली. ते किनारपट्टीवर राहत होते. अशांवर बारीक नजर राहणार आहे. स्थलांतरीत तरुण रोजगारासाठी थांबला पाहिजे, असे काम इथे करायचायकोकणातील तरुण वसई, विरार, नालासोपारा आदी भागात रोजगारासाठी जात होता. हा स्थलांतरीत होणारा तरुण येथेच रोजगारासाठी थांबला पाहिजे, असे काम इथे करायचे आहे. देवगडचा आमदार कधी मंत्री होत नाही. तो नेहमी विरोधी पक्षात बसणार, असा आरोप, टीका केली जात असे. मात्र,आता माझ्या रुपाने एक उदाहरण मिळाले आहे. यापुढे कधीही असा ठपका ठेवला जाणार नाही. 'राणे संपले' म्हणाऱ्यांना उत्तर मिळाले 'राणे संपले' अशी टीका करणाऱ्या विरोधकांना आता त्याचे उत्तर मिळाले असेल. विरोधकांनी दहा वर्षे मला खूप अनुभव दिले आहेत. ते सत्तेत असताना विरोधक म्हणून माझ्याशी कसे वागले, त्याची त्यांना आठवण करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आज माझ्या होणाऱ्या स्वागताचा क्षण कार्यकर्त्यांमुळे अनुभवायला मिळाला. कार्यकर्ते सोबत राहिले. त्यामुळे त्यांचा हट्ट पुरवणं हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या मनाप्रमाणे स्वागत स्वीकारत आहे. असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sea Routeसागरी महामार्ग