शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळातील अतिक्रमणे हटवा

By admin | Updated: August 20, 2014 00:48 IST

लोकशाही दिनात तहसीलदारांचे आदेश

कुडाळ : आकेरी येथील सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधलेल्या शाळेच्या इमारतीसंदर्भात योग्य ती तपासणी करा. तसेच शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी तत्काळ कारवाई करा, असे आदेश कुडाळ तहसीलदार यांनी बांधकाम विभागाला लोकशाही दिनात दिले. कुडाळ तालुक्याचा लोकशाही दिन कुडाळ तहसील कार्यालय येथे तहसीलदार जयराज देशमुख, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, गटविकास अधिकारी व्ही. एस. नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. या लोकशाही दिनात सात अर्ज आले होते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधलेल्या शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून इमारतीमधून पाणी गळत आहे. तसेच पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसतानाही मुलांना या धोकादायक इमारतीत बसविले जाते. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाची चौकशी व्हावी, असा तक्रारअर्ज आकेरी येथील महेश जामदार व नारायण सांगळे यांनी केला होता. वालावल येथील बेकायदेशीर बॅनरबाबत कारवाई व्हावी, मुख्यालयात कायमस्वरुपी तलाठी व पालीस पाटील द्यावा, असे अर्ज वालावल येथील प्रभाकर चौधरी यांनी केले. कुडाळ भैरववाडी येथील पुरुषोत्तम वानेकर यांनी खरेदी खत जमीन मोजणीत तफावत असून पुन्हा जमीन मोजणी करण्यात यावी, असा तक्रार अर्ज केला होता. तर पावशी येथील चंद्रकांत अणावकर यांनी, उत्पन्न देणाऱ्या झाडावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे झाडांचे नुकसान झाल्याबाबत, तर पावशी येथीलच सुहासिनी कुंभार यांनी सार्वजनिक विहिरीकडे जाणारी पायवाट बंद केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता. या सर्व तक्रार अर्जांवर योग्य ती कार्यवाही संबंधित विभागाकडून करण्यात येईल, असे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले. या लोकशाही दिनास संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव जवळ आला असून वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक समस्या वाढत आहेत. शासनाच्या जागेत अतिक्रमणे वाढत चालली आहेत. परंतु यासंदर्भात अतिक्रमणे हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊनही बांधकाम विभाग ही अतिक्रमणे हटविण्याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे या संदर्भात तत्काळ कारवाई करा, असे आदेश तहसीलदारांनी बांधकाम विभागाला दिले. (प्रतिनिधी) ग्रामपंचायत बॅनर हटवित नाही : बिराजदार शहरातील कालबाह्य झालेले तसेच इतर धोकादायक स्थितीतील बॅनर हटवावेत, यासंदर्भात लेखी पत्र ग्रामपंचायत विभागाला दिले होते. परंतु ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले.