शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST

आंदोलन मागे : तिलारी प्रकल्पातील कंत्राटी कामगार रुग्णालयात दाखल

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या कामावरून अचानक कमी करण्यात आल्याने पुनश्च सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या कंत्राटी कामगारांपैकी सुरेश फटी नाईक (वय ४७) यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर पाच जणांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेत त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी सायंकाळी आंदोलन मागे घेतले.गोवा आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी प्रकल्पावर सन १९८५ ते १९९२ पर्यंत हजेरीपटावर कंत्राटी कामगार कार्यरत होते. त्यांच्याकडून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील माती चाचणी, वसाहत देखभाल दुरुस्ती व पाणी पुरवठा अशी कामे करून घेतली जात होती. परंतु १९९२ नंतर हजेरीपट ठेकेदारी पध्दतीवर ही कामे केली जाऊ लागली. याच दरम्यान कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली. परंतु त्याकडे प्रकल्प अधिकारी आणि प्रशासनाने कानाडोळा केला. तसेच दोन महिन्यांपूर्वी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, असे कारण सांगून काही सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनार दोन महिन्यांपूर्वी कामावरून कमी करण्यात आले. तसेच उर्वरित कामगारांना ३० नोव्हेंबर २०१४ पासून कमी करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या. परिणामी शासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात कंत्राटी कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गेले तीन दिवस उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्यांपैकी सहाजणांची प्रकृती खालावली आहे. त्यापैक्ी सुरेश फटी नाईक यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून नारायण फटी गवस, उदय नाईक, सुनील आत्माराम गवस, गणपत भिकाजी गवस व महादेव भिकाजी गवस यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली. कामगारांच्या नोकरीचा प्रश्न हा भाजपचा झाला असून २१ नोव्हेंबरच्या मंत्रालयातील बैठकीत हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगत जठार यांनी कामगारांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यांच्या आश्वासनानंतर कंत्राटी कामगारांनी उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)