शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:04 IST

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ...

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्णजिल्हा परिषदेचा उपक्रम : कुडाळ तालुक्यात सर्वाधिक बंधारे बांधले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४८५६ बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याची टक्केवारी ६९.३७ टक्के एवढी आहे. तसेच कुडाळ तालुक्याने उद्दिष्टापैकी जास्त बंधारे बांधले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने पाणीटंचाईची झळ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा परिषदेने यावर्षी ६ हजार वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला जिल्हा परिषदेने उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. याचबरोबर राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या विभागांना स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍यापैकी ४८५६ एवढे बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत.यामध्ये कणकवली तालुक्याने १००० पैकी ८४४, कुडाळ - १००० पैकी १००९, दोडामार्ग - ४०० पैकी १९४, वेंगुर्ला - ५०० पैकी ४०२, मालवण- १००० पैकी ५८५, देवगड - ९०० पैकी ५६९, सावंतवाडी - १००० पैकी ७२२, वैभववाडी - ४०० पैकी २०४ अशा एकूण ६२०० उद्दिष्टापैकी ४५२९ बंधारे बांधून ७३.५ टक्के बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने ६०० बंधार्‍यापैकी १७२ कच्चे १५५ वनराई असे मिळून ३२७ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत.सामाजिक वनीकरणाचा भोपळा फुटता फुटेना!जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी केवळ २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाला देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्याची वनसंपत्ती सांभाळणार्‍या सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा बांधलेला नाही. या विभागाने अद्याप २०० बंधार्‍याच्या उद्दिष्टाचा भोपळाही फोडलेला नाही. हा विभाग बंधारे बांधण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात पक्के बंधारे होण्याची गरजसिंधुदुर्ग जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे काम करून संभाव्य पाणीटंचाई रोखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे अशा बंदरांची ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्के बंधारे होण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व्हे करून जिल्ह्यात जास्तीत जास्त पक्के बंधारे बांधण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद