शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:04 IST

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ...

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्णजिल्हा परिषदेचा उपक्रम : कुडाळ तालुक्यात सर्वाधिक बंधारे बांधले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४८५६ बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याची टक्केवारी ६९.३७ टक्के एवढी आहे. तसेच कुडाळ तालुक्याने उद्दिष्टापैकी जास्त बंधारे बांधले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने पाणीटंचाईची झळ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा परिषदेने यावर्षी ६ हजार वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला जिल्हा परिषदेने उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. याचबरोबर राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या विभागांना स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍यापैकी ४८५६ एवढे बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत.यामध्ये कणकवली तालुक्याने १००० पैकी ८४४, कुडाळ - १००० पैकी १००९, दोडामार्ग - ४०० पैकी १९४, वेंगुर्ला - ५०० पैकी ४०२, मालवण- १००० पैकी ५८५, देवगड - ९०० पैकी ५६९, सावंतवाडी - १००० पैकी ७२२, वैभववाडी - ४०० पैकी २०४ अशा एकूण ६२०० उद्दिष्टापैकी ४५२९ बंधारे बांधून ७३.५ टक्के बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने ६०० बंधार्‍यापैकी १७२ कच्चे १५५ वनराई असे मिळून ३२७ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत.सामाजिक वनीकरणाचा भोपळा फुटता फुटेना!जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी केवळ २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाला देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्याची वनसंपत्ती सांभाळणार्‍या सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा बांधलेला नाही. या विभागाने अद्याप २०० बंधार्‍याच्या उद्दिष्टाचा भोपळाही फोडलेला नाही. हा विभाग बंधारे बांधण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात पक्के बंधारे होण्याची गरजसिंधुदुर्ग जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे काम करून संभाव्य पाणीटंचाई रोखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे अशा बंदरांची ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्के बंधारे होण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व्हे करून जिल्ह्यात जास्तीत जास्त पक्के बंधारे बांधण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद