शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:04 IST

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ...

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८५६ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्णजिल्हा परिषदेचा उपक्रम : कुडाळ तालुक्यात सर्वाधिक बंधारे बांधले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४८५६ बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याची टक्केवारी ६९.३७ टक्के एवढी आहे. तसेच कुडाळ तालुक्याने उद्दिष्टापैकी जास्त बंधारे बांधले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण घटल्याने पाणीटंचाईची झळ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा परिषदेने यावर्षी ६ हजार वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला जिल्हा परिषदेने उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. याचबरोबर राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या विभागांना स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍यापैकी ४८५६ एवढे बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत.यामध्ये कणकवली तालुक्याने १००० पैकी ८४४, कुडाळ - १००० पैकी १००९, दोडामार्ग - ४०० पैकी १९४, वेंगुर्ला - ५०० पैकी ४०२, मालवण- १००० पैकी ५८५, देवगड - ९०० पैकी ५६९, सावंतवाडी - १००० पैकी ७२२, वैभववाडी - ४०० पैकी २०४ अशा एकूण ६२०० उद्दिष्टापैकी ४५२९ बंधारे बांधून ७३.५ टक्के बंधार्‍याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने ६०० बंधार्‍यापैकी १७२ कच्चे १५५ वनराई असे मिळून ३२७ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत.सामाजिक वनीकरणाचा भोपळा फुटता फुटेना!जिल्ह्याच्या एकूण ७ हजार बंधार्‍याच्या उद्दिष्टापैकी केवळ २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाला देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्याची वनसंपत्ती सांभाळणार्‍या सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा बांधलेला नाही. या विभागाने अद्याप २०० बंधार्‍याच्या उद्दिष्टाचा भोपळाही फोडलेला नाही. हा विभाग बंधारे बांधण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात पक्के बंधारे होण्याची गरजसिंधुदुर्ग जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे काम करून संभाव्य पाणीटंचाई रोखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे अशा बंदरांची ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्के बंधारे होण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व्हे करून जिल्ह्यात जास्तीत जास्त पक्के बंधारे बांधण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद