शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 16, 2014 23:56 IST

नगराध्यक्षांकडून गौरवोद्गार : धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राज्यभर अभियान

प्रसन्न राणे - सावंतवाडी -‘स्वच्छ भारत... एक कदम स्वच्छता की ओर’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर राज्यात सर्व ठिकाणी स्वच्छतेचे अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने रायगड येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी सकाळी संपूर्ण राज्यभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या संस्थेच्यावतीने सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनीही या मोहिमेत सहभाग दर्शवित जिल्हाभरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही या उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले. या स्वच्छता मोहिमेंतर्गत पंचायत समिती, नगरपालिका, शहरातील मोती तलावाचा परिसर, एसटी स्टँड व महामार्गानजिकचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेरही रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी आठ वाजल्यापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात सावंतवाडीसह वेंगुर्ले, मालवण, कणकवली येथील नगर पंचायती, नगर पालिकांच्या आवारात स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात एक हजार याप्रमाणे संस्थेचे सुमारे पाच हजार सदस्य या अभियानात सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत सावंतवाडी शहरातील मोती तलाव परिसर आणि रुग्णालयाच्या परिसरासह दहा ठिकाणची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत संस्थेच्या सदस्यांसह शहरातील नागरिक आणि नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले होते. सावंतवाडी शहरातील सुमारे ५० टन कचरा उचलण्यात आला.यामध्ये सावंतवाडी एसटी बसस्थानक, गोविंद चित्रमंदिर ते न्यायालय, कोर्टाचा आतील परिसर, तहसीलदार कार्यालयाचा परिसर, पोलीस ठाणे, संत गाडगेबाबा महाराज व्यापारी संकुलाचा परिसर, इंदिरा गांधी व्यापारी संकुलाचा परिसर, मुख्य बाजार ते गांधी चौक, हॉटेल मँगोपर्यंत, हॉटेल मँगो व मोती तलावाचा परिसर, आरपीडी हायस्कूलचा परिसर, गार्डन आदी ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे साफसफाई करण्यात आली. साफसफाईनंतर जमा झालेला कचरा आणि गवत प्रतिष्ठानतर्फे दोन डंपर, तसेच सावंवाडी नगर पालिकेच्या तीन कचरा गाड्यांतून कचरा डेपोमध्ये जमा करण्यात आला. याकामी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले. स्थानिकांचाही सहभाग रविवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच या अभियानात सहभागी होण्यासाठी शहरवासीयांची गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत हे साफसफाईचे काम अविश्रांत सुरू होते. या आठ तासांच्या कालावधीत शहराचा शहराचा नक्शाच बदलून गेला होता. या साफसफाईमुळे सावंतवाडी शहर परिसर लख्ख झाला होता. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे स्वच्छता अभियान राबवून यशस्वी करण्यात आले. प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे बजावविल्याने हे अभियान शंभर टक्के यशस्वी झाले.कणकवली शहरात ठिकठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. लोकसहभाग महत्वाचा : साळगावकरसावंतवाडी नगरपालिकेतर्फे दरवर्षी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. परंतु एवढ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून असे पहिलेच अभियान शहरात झाले आहे. कोणत्याही अभियानाच्या यशस्वीतेकरिता लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो, हे आजच्या या स्वच्छता मोहिमेतून दिसून आले. यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि त्यांच्या सदस्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांचे मी आभार मानतो. या मोहिमेचा बोध शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी घेऊन शहराची स्वच्छता अबाधित राहण्यासाठी प्रयत्नशील रहावे.