शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

काजू व्यावसायिकांना भरपाई द्यावी

By admin | Updated: December 29, 2014 00:07 IST

बाबल नाईक : अवकाळी पाऊस ठरला पिकासाठी हानिकारक

कसई दोडामार्ग : अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे काजू बागायतीला फटका बसून जवळजवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तरीही कृषी विभागाकडून नुकसानाचे पंचनामे न झाल्याने कोकणातील काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे काजू व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने याची दखल घेऊन काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजू व्यावसायिक बाबल नाईक यांनी केली आहे. मोहोर येत असताना पडलेला अवकाळी पाऊस काजू उत्पादनासाठी धोकादायक ठरला आहे. या पावसामुळे काजू व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासाठी कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी केली होती. मात्र, शासनाच्या उदासिन धोरणामुळे कृषी विभागाने याची साधी दखलसुद्धा घेत बागायतींना भेटही दिली नाही. याचा फटका काजू व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे काजू व्यावसायिकांनी पत्रकारांना बोलावून काजू बागांची पाहणी करून घेतली. यावेळी केलेल्या पाहणीत काजू बागायतींना अवकाळी पावसाचा बराच फटका बसल्याचे दिसून आले. काजू मोहोर करपून गेला असून काही झाडांना मोहोर न येता पालवी आली असल्याचे आढळून आले. यामुळे काजू पीक होणार नाही, असे नाईक यांनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर देसाई, काजू व्यावसायिक सूर्यकांत देऊलकर, शरद गवस, मायको गवस, सुुवदास मणेरीकर, शरद नाईक उपस्थित होते. यावेळी बाबल नाईक म्हणाले, ज्यावेळी काजू झाडांना मोहोर येतो, त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने आलेला मोहोर करपून गेला व झाडांना मोहोर येण्याऐवजी नवीन पालवी आली. त्यामुळे विकसित १ या काजू झाडांना फटका बसला आहे. ही जात हंगामात एकदाच मोहरते. तसेच १ ते १७ काजू बागायतदारांना याचा फटका बसला आहे. तसेच दमट हवामानामुळे कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झाडांच्या फांदीचा रस शोषून हे कीटक नष्ट करतात. त्यामुळे मोहोर आलेल्या फांद्या करपून गेल्या आहेत. असे असताना कृषी विभागाने बागायतदारांची विचारपूसही केली नाही. झाडांचे पंचनामे केले नाहीत. शासनाच्या जाचक अटीमुळे कोकणातील काजू बागायतदार, सुपारी बागायतदार, नारळ बागायतदार, आंबा बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच येथील हवामानाचा विचार करून शासनाने नियमावली तयार करावी. तसेच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबल नाईक यांनी दिला आहे. उद्योजक चंद्रशेखर देसाई म्हणाले, तालुक्यात ३२०० हेक्टर काजू क्षेत्राची नोंद असली, तरी यापेक्षा अधिक पटीने काजू बागायतीचे क्षेत्र आहे. परंतु त्याची नोंद कृषी विभागाकडे नाही. जंगली भागात मोठ्या प्रमाणात काजू लागवड केली जाते. नुकसानग्रस्त बागायतदारांसह काजू उद्योजकांनाही आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)