शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सिंधुदुर्गवरील बंदरजेटी सदोष

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

रवींद्र चव्हाणांचे चौकशीचे आदेश : पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथे काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली जेटी सदोष पद्धतीची आहे. याबाबत तक्रारीही प्राप्त झाल्या असून या जेटीकामाच्या चौकशीचे आदेश बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या मंत्री चव्हाण यांनी मालवण येथे बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मच्छीमार व व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले. मालवण शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकी दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आप्पा लुडबे, विलास हडकर, भाऊ सामंत, बबलू राऊत, विकी तोरसकर, संदीप शिरोडकर, महेश मांजरेकर, राजू राऊळ, पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर, गोपी पालव, धोंडी चिंदरकर, संतोष गावकर यासह भाजप कार्यकर्ते मालवणसह तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यावसायीक, तालुक्यातील ग्रामस्थ, बंदर विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या, परवाना प्रक्रिया सुलभ होण्याबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. मालवण बंदर जेटी येथे पक्क्या स्वरूपात व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देणे, देवबाग येथे जेटी उभारणे, तारकर्ली खाडीतील गाळ उपसा, देवबाग ते भोगवे या खाडी मार्गावर फेरीबोट उपलब्ध करून देणे, जिओ ट्यूबच्या माध्यमातून बंधाराकम रस्ता उभारणे, मसुरे रमाई नदीतील गाळ उपसा करणे, कोळंब आडारी खाडीपात्रात जलपर्यटनाला प्राधान्य देणे, किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव रक्षकांची नियुक्ती तत्काळ करणे, प्रवाळ व कोरलच्या सुरक्षेस प्राधान्य देणे, तसेच गोव्याच्या धर्तीवर किनाऱ्यावर तात्पुरते तंबू उभारून पर्यटनाला अधिक गती देणे, या सर्वांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवताना काही प्रश्न व समस्या सोडविण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)मालवण पालिकेत शतप्रतिशत भाजपामालवण पालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे. तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकीत भाजपा निश्चितच मोठे यश मिळवेल, असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. सर्वच निवडणुकीत शतप्रतिशत भाजप हेच लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.सरकार आपल्या दारीमालवण शहरात ‘सरकार आपल्या दारी’ या नव्या उपक्रमाचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी शुभारंभ करण्यात आला. शहरात घरोघरी जाताना सरकारच्या विविध योजनाची माहिती देण्यात येणार आहे. यावेळी समस्या जाणून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली.