शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल; सिंधुदुर्गातील सावडावमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:15 IST

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतीत इयत्ता तिसरी ते सहावी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या ६ मुलांचे ...

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतीत इयत्ता तिसरी ते सहावी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या ६ मुलांचे दोन अनोळखी व्यक्तींकडून चारचाकी गाडीतून अपहरण करण्याची घटना घडली आहे. मात्र, त्या मुलांनी प्रसंगावधान दाखवत त्या दोन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. ही घटना काल, सोमवारी (दि.१३) घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन अज्ञात अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा चौफेर तपास करण्यात येत आहे. सावडाव येथील पाचवी व सहावीत शिकत असणाऱ्या ५ मुली व तिसरीत शिकणारा १ मुलगा एका वाडीतील एका घरातील कुमारिका ओवाळणीचा कार्यक्रम आटपून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डगरेवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये जात होते. दरम्यान, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.मात्र, मुलांनी चालक व त्याचा अन्य एक  सोबती हे फोनवर  बोलत असल्याची संधी साधली. तसेच त्या वेळात गाडीतून मुलांनी पळ काढला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.कुमारिका ओवाळणीच्या कार्यक्रमासाठी काही शाळकरी मुले सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गेली  होती.त्यापैकी काही मुले आपल्या घरी निघून गेली.त्यानंतर ५ मुली आणि एक मुलगा जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत नेहमीप्रमाणे  निघाली होती. साधारणतः ५०० मीटर अंतरावर ती चालत पोहचली असतानाच एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी तिथे आली. त्यातून दोघेजण खाली उतरले. तसेच त्या शाळकरी मुलांना चाकूचा धाक दाखवत त्यांनी गाडीत कोंबले. त्या ठिकाणी चारचाकीमधील एका व्यक्तीने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर लाल कुंकू लावले.आणि सुसाट वेगाने जँगलमय भागात काही अंतरावर गेल्यावर पाच मुलांची दप्तरे तेथील ओहोळात टाकली. एक दप्तर मुलांजवळच राहिले.प्राथमिक शाळा नं. १ पार करून चारचाकी पुढे गेली. ही चारचाकी धनगरवाडीकडे जात होती.तेवढ्यात त्या अपहरण करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुले तो चारचाकी मधून खाली उतरून बोलायला लागला. त्या पाठोपाठ दुसरी व्यक्ती देखील खाली उतरली. ती संधी साधत त्या शाळकरी मुलांनी चारचाकीचा दरवाजा उघडुन खाली उतरत रस्त्याच्या उलट्या दिशेने धावत पळ काढला. यावेळी तेथीलच एका शाळेतील  शिक्षक अशोक साळुंखे- देशमुख व इतरांना मुले पळताना दिसली. त्यांनी त्या मुलांना गाठले. तसेच पळण्याचे कारण विचारले.त्यानंतर सर्व मुलांनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न कसा झाला? याबाबत त्यांना माहिती कथन केली.एका मुलीच्या डोक्यावर नखाणी ओरबाडल्याच्या खुणाही दिसून येत होत्या. त्यामुळे ताबडतोब सर्व पालकांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना फोनवर संबधित घटनेची माहिती शिक्षकांनी कळवली.काही वेळातच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले. यावेळी सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्तात्रय काटे, संजय झगडे, चंद्रकांत तेली, परशुराम झगडे, पोलीस पाटील अंकुश वारंग, पालक  संतोष गावकर,कुमार कामतेकर, संतोष जठार, राजेंद्र वारंग, प्रदीप गावकर, संतोष मोरे, चंद्रकांत मेस्त्री, महेश पुजारे, संतोष तेली, तुकाराम तेली, मंगेश मेस्त्री, विद्याधर वारंग, साईनाथ डगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.कणकवली पोलिसांनाही घटनेबाबत  कळवण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अनिल जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक रामचंद्र शेळके, कणकवली  सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगाडे, हवालदार मिलिंद देसाई आदींचे पथक दाखल झाले. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, अज्ञात अपहरणकर्त्यांचा सुगावा लागू शकला नाही.त्या अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यापूर्वी या घटनेसारख्या अन्य साम्य असलेल्या घटना पाहून तपासाचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण