शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

...तर विजयदुर्ग जगातील सुंदर बंदर बनेल

By admin | Updated: August 29, 2014 23:09 IST

दिवाकर प्रसाद : विजयदुर्ग येथे सागरी विकास परिषद

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ला परिसरातील समुद्र आणि खाडी याचा अभ्यास करून आरमाराच्या दृष्टीकोनातून या किल्ल्याचे महत्त्व जाणून घेतले होते. विजयदुर्गची भौगोलिक परिस्थिती अभ्यासली असता या परिसरात ग्रीनफिल्ड पोर्ट ते अल्टिमेंट हार्बर पोर्ट अशी चार प्रकारची बंदरे बांधणे शक्य आहे. विजयदुर्ग खाडीतील गाळ काढल्यास मुंबई न्हावाशेवापेक्षा १५ पट अधिक क्षमतेचा तसेच जगातील सर्वात मोठे अल्टिमेट हार्बर बंदर उभे राहू शकेल. किंबहुना या विजयदुर्ग बंदरामुळे भारतातील दुसरी मुंबई वसवण्याची क्षमता आहे, असे मत मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी दिवाकर प्रसाद यांनी व्यक्त केले.सिंधुभूमी फाऊंडेशन व कोकण क्लबच्यावतीने विजयदुर्गमधील एमटीडीसीच्या सभागृहात नुकतीच सागरी विकास परिषद झाली. यात कोकण व्हिजन २०१५ अंतर्गत कोकणातील बंदरांचा विकास व जलवाहतूक या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी विजयदुर्ग बंदराचा विकास करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने नियुक्त केलेले अधिकारी दिवाकर प्रसाद यांच्यासह गुजरात राज्यातील बंदरांचा प्रतिकूल परिस्थितीत विकास करणारे मालवणचे कॅ. यतीन देऊलकर, काताळे- रत्नागिरी येथील खासगी बंदराचे संस्थापक कॅ. दिलीप भाटकर या तज्ज्ञांसह आमदार प्रमोद जठार, संजय यादवराव, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते. मेरीटाईम बोर्डाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांचा अभ्यास करण्यासाठी १९९८ मध्ये प्रमुख अधिकारी म्हणून दिवाकर प्रसाद यांची नियुक्ती केली होती. त्यांनी जयगडसह विजयदुर्ग आणि रेडी बंदरांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीनफिल्ड पोर्टसाठी आवश्यक १६ मीटर खोली विजयदुर्ग बंदरासाठी उपलब्ध आहे.कॅ. भाटकर यांनी कोकणामध्ये १९६८ मध्ये कोकण सेवक प्रवासी बोट वाहतूक सुरू केली. याचा अर्थ कोकणातील बंदरे पूर्वीपासून प्रवासी बोट वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत. मात्र, मधल्या काळात ही बोट सेवा बंद पडली. राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पुन्हा सुरू झाली नाही. मात्र विजयदुर्ग बंदराचा विकास झाल्यास तसेच अन्य बंदरातील गाळ काढला गेल्यास कोकणामध्ये पुन्हा सागरी जलवाहतूक सुरू होणे शक्य आहे. कॅ. इंद्रजीत सावंत यांनी, रस्ते, रेल्वे, विमान माल वाहतुकीच्या तुलनेने जल माल वाहतूक अत्यंत किफायतशीर असते. जागतिक आयात-निर्यातीमध्ये ७० टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ६७ वर्षे झाली. देशाला तीन बाजूंनी समुद्रकिनारा लाभला आहे. तरीही जलवाहतुकीचा वाटा केवळ १२ टक्केच एवढा राहिला आहे. आजवर कोकणातील अनेक बंदरे विकसीत करण्याच्या घोषणा कागदावरच राहिल्या, असे सांगितले. (प्रतिनिधी)बंदरांच्या नफ्याचे प्रमाण सरासरी ३८ टक्केजागतिक दर्जाची अल्टिमेट हार्बर जेटी उभारण्यासाठी २५ मीटर खोलीची गरज असते. विजयदुर्ग खाडीचा गाळ काढल्यास एवढी खोली मिळणे सहज शक्य आहे. कोकणासह राज्यातील खासदारांनी विजयदुर्ग बंदर होण्यासाठी जोर लावला तर या ठिकाणी जागतिक दर्जाचे सर्वात मोठे अल्टिमेट हार्बर बंदर भविष्यात होऊ शकेल. त्यामुळे विजयदुर्गसह सिंधुदुर्ग आणि लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात दुसरे मुंबई शहर वसवणे हे वास्तववादी स्वप्न ठरेल. याशिवाय अन्य तीन प्रकारची छोटी बंदरे विजयदुर्ग परिसरात उभारणे शक्य आहे. या चारही बंदरांच्या नफ्याचे प्रमाण सरासरी ३८ टक्क्यांच्या दरम्यान राहील.