शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

अळंबी प्रकल्पांना मदतीची गरज-युवा उद्योजकांचे लॉकडाऊनच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 4:06 PM

सिंधुदुर्गातील अनेकजण सध्या आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अळंबी शेतीसाठी व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने  आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्यावसायिकांनी  शासनाकडे   केली आहे. 

ठळक मुद्देकोरोनाचा फटका :  तयार माल जाग्यावरच खराब झाला.

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -फणसवाडी येथील युवा उद्योजक  योगेश कृष्णा देसाई  यांनी   नोकरीच्या मागे न लागता अळंबी शेती   गावात सुरू केली आहे. योेगेश हे उच्चशिक्षित आहेत. मुंबईतील धकाधकीच्या जीवनाला कंटाळून आपली नोकरी सोडून ते गेली ४ ते ५ वर्षे गावात अळंबी व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात अनेक चढउतार त्यांनी पाहिले. व्यवसायात त्यांचा जम बसला होता. पण  गेले दोन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यान अळंबीचा  तयार माल जाग्यावरच खराब झाला. यामुळे हा  व्यवसाय  डबघाईला आला आहे. देसाई यांचे मोठे नुकसान झाले.    

सिंधुदुर्गातील अनेकजण सध्या आर्थिक संकटात आहेत. जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अळंबी शेतीसाठी व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने  आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी अळंबी व्यावसायिकांनी  शासनाकडे   केली आहे. 

सध्या सिंधुदुर्गात दहाहून  अधिक उद्योजक अळंबी शेती करतात. लॉकडाऊनच्या काळात माल तयार असूनही तो जाग्यावरच खराब झाल्याने युवा उद्योजक मोठ्या आर्थिक संकटात सापडले. यामुळे त्यांचे  लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गात सध्या १० अळंबी प्रकल्प उभे आहेत. त्यात सरासरी महिन्याकाठी एकूण   ३ ते ३.५ टन मशरुम (अळंबी)चे उत्पादन होते. यातून महिन्याची एकूण अंदाजे उलाढाल ९ ते १० लाखांच्या आसपास होती. सर्व अळंबीची  स्थानिक बाजारपेठेतील हॉटेल तसेच शेजारच्या  गोवा राज्यातील बाजारपेठ येथे मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. सर्व हॉटेल, सुपर मार्केट हे बंद असल्यामुळे युवा उद्योजकांना अळंबी व्यवसाय बंद करण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या काळात या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तरुणांना न्याय द्यावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. मात्र, जिल्ह्यातील अळंबी प्रकल्पांना राज्यशासनाने काही प्रमाणात अर्थसहाय्य केले तर अळंबी (मशरूम) व्यावसायीक लॉकडाऊनंतर पुन्हा नव्या जिद्दीने हा व्यवसाय सुरू करू शकतील. याशिवाय कोकणातील सुशिक्षित तरुणांना पुन्हा योग्य ती दिशा मिळेल. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या  इतर लोकांनाही नवीन रोजगार मिळू शकेल. तरी शासन व प्रशासनाने या व्यवसायाला चालना देऊन होतकरू तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी युवा उद्योजक योगेश देसाई यांनी केली आहे.

 

लॉकडाऊन काळात डेगवे येथे अळंबी माल जाग्यावरच खराब झाल्याने युवा उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय