शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:42 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील खनिज साठ्यांच्या उत्खननाला ग्रामस्थांचा विरोध होऊ नये याकरिता सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम भाजपचे मंत्री व नेतेमंडळींकडून सुरू आहे. हा कुटील डाव सिंधुदुर्गवासीयांनी हाणून पाडण्यासाठी लढा दिला पाहिजे. या लढ्यात काँग्रेस पक्ष जिल्हावासीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. वागदे येथील गोपुरी आश्रामाला सपकाळ यांनी भेट दिली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंत व सामाजिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल डेगवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, डॉ. मंगेश सावंत आदी उपस्थित होते.     सपकाळ म्हणाले, तोडा-फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. याविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे.  राणे-पित्रापुत्र सत्तेत असल्याने त्यांनी जिल्ह्यात पुन्हा राजकीय दहशतवाद माजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू लागला आहे. तो बिघडू नये म्हणून परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी या दहशतवादविरोधात लढाई सुरु केली पाहिजे. या लढाईत काँग्रेस पक्ष आपल्या खांद्याला खांदा लावून लढेल.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होताना दिसत आहे. पक्ष संघटनेचे नेटवर्क मजबूत होण्यासाठी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कृती कार्यक्रम दिले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने वाटचाल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष गाव ते राष्ट्रीय पातळीवर पुन्हा गतवैभव प्राप्त करेल. सिंधुदुर्गातील विचारवंत, परिवर्तन चळवळीतील मंडळी, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या जनहितार्थ असलेल्या उपक्रमांमध्ये आणि भाजपविरोधी लढ्यात पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या संवादा दरम्यान भाजपचे मंत्री व नेते हे एका धर्माला टार्गेट करीत आहेत. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, असे ऍड. संदीप निंबाळकर म्हणाले. काँग्रेस पक्षाने परिवर्तनवादी, समाजवादी चळवळींशी व सामाजिक संस्थांशी कनेक्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी सपकाळ यांचे गोपुरी आश्रमाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशामुक्ती मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, साहित्यिका सरिता पवार, दादा कुडतरकर आदी उपस्थित होते.सदभावना पदयात्रा काढणार बिघडलेला सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष लवकरच जिल्ह्यात सदभावना पदयात्रा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळMahayutiमहायुतीBJPभाजपा