शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:42 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील खनिज साठ्यांच्या उत्खननाला ग्रामस्थांचा विरोध होऊ नये याकरिता सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम भाजपचे मंत्री व नेतेमंडळींकडून सुरू आहे. हा कुटील डाव सिंधुदुर्गवासीयांनी हाणून पाडण्यासाठी लढा दिला पाहिजे. या लढ्यात काँग्रेस पक्ष जिल्हावासीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. वागदे येथील गोपुरी आश्रामाला सपकाळ यांनी भेट दिली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंत व सामाजिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल डेगवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, डॉ. मंगेश सावंत आदी उपस्थित होते.     सपकाळ म्हणाले, तोडा-फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. याविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे.  राणे-पित्रापुत्र सत्तेत असल्याने त्यांनी जिल्ह्यात पुन्हा राजकीय दहशतवाद माजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू लागला आहे. तो बिघडू नये म्हणून परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी या दहशतवादविरोधात लढाई सुरु केली पाहिजे. या लढाईत काँग्रेस पक्ष आपल्या खांद्याला खांदा लावून लढेल.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होताना दिसत आहे. पक्ष संघटनेचे नेटवर्क मजबूत होण्यासाठी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कृती कार्यक्रम दिले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने वाटचाल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष गाव ते राष्ट्रीय पातळीवर पुन्हा गतवैभव प्राप्त करेल. सिंधुदुर्गातील विचारवंत, परिवर्तन चळवळीतील मंडळी, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या जनहितार्थ असलेल्या उपक्रमांमध्ये आणि भाजपविरोधी लढ्यात पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या संवादा दरम्यान भाजपचे मंत्री व नेते हे एका धर्माला टार्गेट करीत आहेत. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, असे ऍड. संदीप निंबाळकर म्हणाले. काँग्रेस पक्षाने परिवर्तनवादी, समाजवादी चळवळींशी व सामाजिक संस्थांशी कनेक्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी सपकाळ यांचे गोपुरी आश्रमाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशामुक्ती मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, साहित्यिका सरिता पवार, दादा कुडतरकर आदी उपस्थित होते.सदभावना पदयात्रा काढणार बिघडलेला सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष लवकरच जिल्ह्यात सदभावना पदयात्रा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळMahayutiमहायुतीBJPभाजपा