शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:42 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील खनिज साठ्यांच्या उत्खननाला ग्रामस्थांचा विरोध होऊ नये याकरिता सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम भाजपचे मंत्री व नेतेमंडळींकडून सुरू आहे. हा कुटील डाव सिंधुदुर्गवासीयांनी हाणून पाडण्यासाठी लढा दिला पाहिजे. या लढ्यात काँग्रेस पक्ष जिल्हावासीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. वागदे येथील गोपुरी आश्रामाला सपकाळ यांनी भेट दिली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंत व सामाजिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल डेगवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, डॉ. मंगेश सावंत आदी उपस्थित होते.     सपकाळ म्हणाले, तोडा-फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. याविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे.  राणे-पित्रापुत्र सत्तेत असल्याने त्यांनी जिल्ह्यात पुन्हा राजकीय दहशतवाद माजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू लागला आहे. तो बिघडू नये म्हणून परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी या दहशतवादविरोधात लढाई सुरु केली पाहिजे. या लढाईत काँग्रेस पक्ष आपल्या खांद्याला खांदा लावून लढेल.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होताना दिसत आहे. पक्ष संघटनेचे नेटवर्क मजबूत होण्यासाठी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कृती कार्यक्रम दिले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने वाटचाल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष गाव ते राष्ट्रीय पातळीवर पुन्हा गतवैभव प्राप्त करेल. सिंधुदुर्गातील विचारवंत, परिवर्तन चळवळीतील मंडळी, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या जनहितार्थ असलेल्या उपक्रमांमध्ये आणि भाजपविरोधी लढ्यात पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या संवादा दरम्यान भाजपचे मंत्री व नेते हे एका धर्माला टार्गेट करीत आहेत. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, असे ऍड. संदीप निंबाळकर म्हणाले. काँग्रेस पक्षाने परिवर्तनवादी, समाजवादी चळवळींशी व सामाजिक संस्थांशी कनेक्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी सपकाळ यांचे गोपुरी आश्रमाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशामुक्ती मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, साहित्यिका सरिता पवार, दादा कुडतरकर आदी उपस्थित होते.सदभावना पदयात्रा काढणार बिघडलेला सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष लवकरच जिल्ह्यात सदभावना पदयात्रा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळMahayutiमहायुतीBJPभाजपा