शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी, स्वच्छ शहरांना राज्य सरकारकडून बक्षीस : सुधाकर जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 4:49 PM

केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात्मक असल्याचे विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी : विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप सर्व नगरपालिकांचे स्वच्छतेत चांगले काम : जगताप सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, कणकवली शहरांत स्वच्छता अ‍ॅप

सावंतवाडी : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात्मक असल्याचे विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले.

जगताप यांनी सावंतवाडी शहर स्वच्छतेबाबत गुरुवारी नगरसेवकांची खास बैठक येथील लोकमान्य टिळक सभागृहात घेतली. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे आदी उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा समावेश हा पश्चिम विभागात केला आहे. या विभागात महाराष्ट्राप्रमाणे गोवा व गुजरात तसेच केंद्रशासित प्रदेश आहेत.

या विभागात १०३१ शहरे असून त्यातील पहिल्या २० शहरांना केंद्र सरकार गौरविणार आहे. तर महाराष्ट्र सरकारही केंंद्र सरकारच्या वर्गीकरणाप्रमाणे एक विशेष बक्षीस देणार आहे. या बक्षिसांची रक्कम अद्याप ठरली नाही. बक्षीस देणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये कोकणातील २५ शहरांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहर स्वच्छतेसाठी एकूण ४ हजार गुणांची ही स्पर्धां असणार आहे. त्यातून वेगवेगळ्या कामांसाठी गुणांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात स्वच्छता अ‍ॅप तसेच स्वच्छतेबाबतची माहिती तसेच प्रत्यक्षात काम, नागरिकांमधील जनजागृती आदींचा समावेश करण्यात आला आहे.

४ जानेवारीपासून प्रत्यक्ष केंद्रीय समिती प्रत्येक शहरात जाऊन नागरिकांशी चर्चा करणार आहे. तसेच स्वच्छतेबाबतही माहिती घेणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर करणे गरजेची असल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्व नगरपालिकांचे स्वच्छतेत चांगले कामसिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण व कणकवली या चार शहरांनी भाग घेतला आहे. सर्व नगरपालिका आपल्यापरीने स्वच्छतेत चांगले काम करीत आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे. सावंतवाडीतही मी स्वत: पालिका अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर गुरुवारी नगराध्यक्ष व नगरसेवकांसोबत चर्चा केली आहे. सर्वजण स्वच्छतेबाबत गंभीर आहेत.

नागरिकांमध्येही उत्साह निर्माण केला आहे. या सर्व मोहिमेत माहिती तयार करणे तसेच अ‍ॅप जास्तीतजास्त नागरिकांपर्यत पोहोचवणे हेच महत्त्वाचे असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग