शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लैंगिक जीवन : केवळ ३ महिन्यात अनेकांना उद्भभवते ही गंभीर समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 4:04 PM

आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी तसा तर जोडीदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना वेळोवेळी करावा लागतो. पण यात जोडीदारांमध्ये लैंगिक उत्साह कायम राहणं किंवा ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं.

(Image Credit : Psychology Today)

आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी तसा तर जोडीदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना वेळोवेळी करावा लागतो. पण यात जोडीदारांमध्ये लैंगिक उत्साह कायम राहणं किंवा ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. मुळात यावर आधीही खूपकाही लिहिलं आणि बोललं गेलं आहे की, काही वर्षांनी कशाप्रकारे लैंगिक जीवनातील रस कमी होतो. अनेक अभ्यासकांनी यावर अभ्यासही केले आहेत की, कशाप्रकारे काही लोक शारीरिक संबंधांबाबत अरसिक होता.  

काय सांगतो रिसर्च?

लीडिंग मेडिकल रिसर्च जर्नल BMJ कडून करण्यात आलेल्या एका ओपन सर्वेनुसार, ३४ टक्के महिला आणि १५ टक्के पुरुष केवळ तीन महिन्यानंतरच शारीरिक संबंधाबाबत रस गमावून बसतात. म्हणजेच त्यांना त्यात अरसिकता वाटायला लागते.

महिलांची लवकर होतात अरसिक

या सर्वेदरम्यान याही गोष्टीचा खुलासा झाला आहे की, एखाद्या नात्यात जर एका व्यक्तीचा लैंगिक क्रियेतील उत्साह कमी होणं त्या व्यक्तींचा लिंग काय आहे यावरही अवलंबून असतं. अभ्यासकांनुसार, वचनबद्ध नात्यात राहणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक लवकर उत्साह गमावून बसतात. 

महिलांनी सांगितली ही कारणे

या सर्वेमध्ये सहभागी महिलांनी शारीरिक संबंधातील उत्साह किंवा रस कमी होण्यामागची वेगवेगळी कारणे सांगितली. यातील सर्वात जास्त महिलांनी हे सांगितले की, जोडीदारासोबत त्यांची लैंगिक सुसंगतता चांगली नव्हती. त्या कारणाने कामेच्छा कमी झाली. त्यासोबतच जोडीदारासोबत लैंगिक क्रियेबाबत पसंती-नापसंती न जुळणे हेही यातील रस कमी होण्याच्या कारणात आहे. 

कामेच्छेवर पडतो वयाचा प्रभाव

अभ्यासकांना हेही आढळलं की, एखाद्या गंभीर नात्यात जोडीदारांमध्ये जर कामेच्छा कमी होत असेल तर यामागे त्यांचं वाढतं वयही कारणीभूत असतं. याचा अर्थ असा की, जसजसं जोडीदारांचं वय वाढत जातं तसतसं त्यांचं एकमेकांबाबत असलेलं लैंगिक आकर्षण कमी होतं. 

नात्यात अरसिकता येऊ देऊ नका

तज्ज्ञांनुसार, वचनबद्ध नात्यात लैंगिक संबंधाबाबत अरसिकता येऊ नये याची काळजी जोडीदारांनी घेणे गरजेचे आहे. जोडप्याने एकमेकांशी बोलून लैंगिक संबंधाबात पसंती-नापसंती याबाबत माहिती घेतली पाहिजे. जेणेकरुन दोघांमध्ये गैरसमज होऊ नये किंवा न्यूनगंड येऊ नये.

काही लपवू नका

अनेकवर्षांपासून असलेल्या नात्यात काही काळाने लैंगिक संबंधाबाबत उत्साह कमी होणे सामान्य बाब आहे. पण ही बाब जोडीदारापासून लपवून ठेवण्याऐवजी यावर दोघांनी मोकळेपणाने बोलावे. एखादी समस्या निर्माण होते तेव्हा त्यावेळीच जर त्यावर उपाय केला गेला तर पुढे होणारी मोठी समस्या टाळता येऊ शकते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स