शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

त्यांच्या रागांच्या झळांत होरपळताहेत वन्यजीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे दिसून येत आहेत. कारवाई करणाऱ्या वनविभागाची त्रेधा उडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रकारामुळे नाहकपणे वनसंपदा आणि वन्यजीव यांची न भरून येणारी हानी होत असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही.

नैसर्गिक समृध्दी आणि वनसंपदा मुबलक उपलब्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यात वनक्षेत्राचाही उत्तमपणे सांभाळ करण्यात आला आहे. परिणामी बिबट्यासह अनेक वन्यप्राणी जिल्ह्याच्या वनक्षेत्रात मुक्तपणे वावरत असल्याचे आढळून येते. सुरक्षित अधिवास लाभल्यामुळे वन्यजीवांची संख्याही या परिसरात वाढल्याचे पहायला मिळते. ही समृध्दता टिकवून ठेवण्यासाठी आणि वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी वनविभाग कार्यरत राहतो.

हिवाळा संपून उन्हाच्या रापीमुळे वनक्षेत्रातील गवत वाळू लागले की वणवा लागण्याच्या घटना सुरू होतात. गतवर्षी लॉकडाऊन आणि कोविडमुळे जिल्ह्यात वणव्याचे प्रमाण मर्यादित होते. अंधश्रध्दा आणि पारंपरिक विचारांच्या पगड्यामुळे खासगी क्षेत्र जाळत असताना वणवा लागल्याच्या घटना मागच्यावर्षी घडल्या होत्या. वर्षभरात वनकारवाई केलेल्या गावांतच वणवा लागल्याने याविषयी चर्चा सुरू झाली.

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सातारा तालुक्यातील काही गावांच्या तरूणाईने या वृत्ताला दुजोराही दिला आहे. याबाबत तक्रार केली तर गावात वाद होतील म्हणून हा विषय आम्ही कुठेच बोललो नाही. पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, किंवा ज्यांचे वनक्षेत्रातील अतिक्रमण काढले गेलेय त्यांच्याकडून चिडून हा प्रकार होत असल्याची माहिती तरूणाईने दिली.

चौकट :

माणसांची जिरवायला प्राण्यांची आहुती!

वनक्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभागाची असते. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये शिकार, बेकायदेशीर वृक्षतोड, वन हद्दीतील बांधकाम करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर वन कायद्यांन्वये गुन्हे दाखल केले जातात. ज्या ज्या गावांमध्ये वनविभागाच्यावतीने अशी कारवाई झाली आहे, त्याच गावात वणवा लागल्याची घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. वनक्षेत्राच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वनविभागावरील राग काढण्याच्या निमित्ताने वनसंपदा आणि वन्यजीव यांच्या जिवावर उठणेे मानवतेला धरून नाही, हे नक्की.