शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

त्यांच्या रागांच्या झळांत होरपळताहेत वन्यजीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे दिसून येत आहेत. कारवाई करणाऱ्या वनविभागाची त्रेधा उडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रकारामुळे नाहकपणे वनसंपदा आणि वन्यजीव यांची न भरून येणारी हानी होत असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही.

नैसर्गिक समृध्दी आणि वनसंपदा मुबलक उपलब्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यात वनक्षेत्राचाही उत्तमपणे सांभाळ करण्यात आला आहे. परिणामी बिबट्यासह अनेक वन्यप्राणी जिल्ह्याच्या वनक्षेत्रात मुक्तपणे वावरत असल्याचे आढळून येते. सुरक्षित अधिवास लाभल्यामुळे वन्यजीवांची संख्याही या परिसरात वाढल्याचे पहायला मिळते. ही समृध्दता टिकवून ठेवण्यासाठी आणि वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी वनविभाग कार्यरत राहतो.

हिवाळा संपून उन्हाच्या रापीमुळे वनक्षेत्रातील गवत वाळू लागले की वणवा लागण्याच्या घटना सुरू होतात. गतवर्षी लॉकडाऊन आणि कोविडमुळे जिल्ह्यात वणव्याचे प्रमाण मर्यादित होते. अंधश्रध्दा आणि पारंपरिक विचारांच्या पगड्यामुळे खासगी क्षेत्र जाळत असताना वणवा लागल्याच्या घटना मागच्यावर्षी घडल्या होत्या. वर्षभरात वनकारवाई केलेल्या गावांतच वणवा लागल्याने याविषयी चर्चा सुरू झाली.

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सातारा तालुक्यातील काही गावांच्या तरूणाईने या वृत्ताला दुजोराही दिला आहे. याबाबत तक्रार केली तर गावात वाद होतील म्हणून हा विषय आम्ही कुठेच बोललो नाही. पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, किंवा ज्यांचे वनक्षेत्रातील अतिक्रमण काढले गेलेय त्यांच्याकडून चिडून हा प्रकार होत असल्याची माहिती तरूणाईने दिली.

चौकट :

माणसांची जिरवायला प्राण्यांची आहुती!

वनक्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभागाची असते. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये शिकार, बेकायदेशीर वृक्षतोड, वन हद्दीतील बांधकाम करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर वन कायद्यांन्वये गुन्हे दाखल केले जातात. ज्या ज्या गावांमध्ये वनविभागाच्यावतीने अशी कारवाई झाली आहे, त्याच गावात वणवा लागल्याची घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. वनक्षेत्राच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वनविभागावरील राग काढण्याच्या निमित्ताने वनसंपदा आणि वन्यजीव यांच्या जिवावर उठणेे मानवतेला धरून नाही, हे नक्की.