शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
2
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
3
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
4
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
5
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
6
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
7
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
8
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
10
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
11
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
13
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
14
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
15
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
16
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
17
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
18
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
19
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
20
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
Daily Top 2Weekly Top 5

कास डोंगरमाथ्यावर पारंपरिक जलव्यवस्थापनातून गव्हाची शेती!, नेमकी कशी केली जाते ही शेती ?,..जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 17:43 IST

रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते.

सागर चव्हाण

पेट्री : कास पठार भागातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली तसेच डोंगरांमध्ये असणाऱ्या झऱ्याचे पाणी काही अंतरावरून शेणाने, चिखल मातीत सारवलेल्या आडात आणून रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते. शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते.

या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर शेतकऱ्यांकडून भिजवले जाते.

डोंगरमाथ्यावर दरवर्षी अतिपर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची, मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस झऱ्यांना खूप पाणी असते. जसजसा उन्हाळा येईल तसतसे झऱ्याचे पाणी कमी होते. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.

गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी काही अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात. साधारण आड बारा-पंधरा फूट लांब, सात-आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. आडातले पाणी आटू नये, यासाठी चिखल माती, शेणाने आड वारंवार सारवला जातो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून साधारण एका वेळेला गुंठाभर शेतजमीन भिजवली जाते.आळीपाळीने ज्याचा दिवस असेल ते आड फोडून शेतजमीन भिजवतात. त्यानंतर पुन्हा शेणाने सारवून त्यात पाणी तुंबवले जाते. शेतजमीन भिजवण्याची ज्यांची वेळ असेल त्यांच्याकडून झऱ्याच्या ठिकाणी छोट्याशा कुंडीतील, पाटातील साफसफाई केली जाते. पाणी कमी येत असल्यास खेकड्यांकडून आड अथवा पाट फोडला आहे का? यावर लक्ष ठेवले जाते.

आड शेणाने, चिखल मातीत सारवणे, लिपणे बऱ्याचदा करतात. सकाळी आड फोडल्यानंतर संध्याकाळपर्यंत पाण्याने भरला जातो. झऱ्याला मुबलक पाणी असूनही शेती भिजवता येत नाही; परंतु ते पाणी आडात साठवून ठेवल्यास शेतजमीन लवकर भिजवण्यास मदत होते. तासाभरात आड रिकामा होतो. पाटाऐवजी बऱ्याच ठिकाणी पाईपदेखील वापरतात. ऑक्टोबर,नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च असे सहा महिने आडाचा वापर होतो.

बहुतांशी ठिकाणी अनेकविध गावांत अशा प्रकारची पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे. एक दिवस सगळे एकत्रित येऊन आड बनवतात. आपल्याला मिळालेल्या कालावधीनुसार साधारण दोन दिवसांत जेवढे रान भिजेल तेवढे भिजवले जाते. नंतर दुसऱ्याची बारी येते. -प्रदीप शिंदे, कासाणीमुरा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारFarmerशेतकरी