शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कास डोंगरमाथ्यावर पारंपरिक जलव्यवस्थापनातून गव्हाची शेती!, नेमकी कशी केली जाते ही शेती ?,..जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 17:43 IST

रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते.

सागर चव्हाण

पेट्री : कास पठार भागातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली तसेच डोंगरांमध्ये असणाऱ्या झऱ्याचे पाणी काही अंतरावरून शेणाने, चिखल मातीत सारवलेल्या आडात आणून रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते. शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते.

या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर शेतकऱ्यांकडून भिजवले जाते.

डोंगरमाथ्यावर दरवर्षी अतिपर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची, मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस झऱ्यांना खूप पाणी असते. जसजसा उन्हाळा येईल तसतसे झऱ्याचे पाणी कमी होते. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.

गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी काही अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात. साधारण आड बारा-पंधरा फूट लांब, सात-आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. आडातले पाणी आटू नये, यासाठी चिखल माती, शेणाने आड वारंवार सारवला जातो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून साधारण एका वेळेला गुंठाभर शेतजमीन भिजवली जाते.आळीपाळीने ज्याचा दिवस असेल ते आड फोडून शेतजमीन भिजवतात. त्यानंतर पुन्हा शेणाने सारवून त्यात पाणी तुंबवले जाते. शेतजमीन भिजवण्याची ज्यांची वेळ असेल त्यांच्याकडून झऱ्याच्या ठिकाणी छोट्याशा कुंडीतील, पाटातील साफसफाई केली जाते. पाणी कमी येत असल्यास खेकड्यांकडून आड अथवा पाट फोडला आहे का? यावर लक्ष ठेवले जाते.

आड शेणाने, चिखल मातीत सारवणे, लिपणे बऱ्याचदा करतात. सकाळी आड फोडल्यानंतर संध्याकाळपर्यंत पाण्याने भरला जातो. झऱ्याला मुबलक पाणी असूनही शेती भिजवता येत नाही; परंतु ते पाणी आडात साठवून ठेवल्यास शेतजमीन लवकर भिजवण्यास मदत होते. तासाभरात आड रिकामा होतो. पाटाऐवजी बऱ्याच ठिकाणी पाईपदेखील वापरतात. ऑक्टोबर,नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च असे सहा महिने आडाचा वापर होतो.

बहुतांशी ठिकाणी अनेकविध गावांत अशा प्रकारची पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे. एक दिवस सगळे एकत्रित येऊन आड बनवतात. आपल्याला मिळालेल्या कालावधीनुसार साधारण दोन दिवसांत जेवढे रान भिजेल तेवढे भिजवले जाते. नंतर दुसऱ्याची बारी येते. -प्रदीप शिंदे, कासाणीमुरा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारFarmerशेतकरी