शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

कास डोंगरमाथ्यावर पारंपरिक जलव्यवस्थापनातून गव्हाची शेती!, नेमकी कशी केली जाते ही शेती ?,..जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 17:43 IST

रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते.

सागर चव्हाण

पेट्री : कास पठार भागातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली तसेच डोंगरांमध्ये असणाऱ्या झऱ्याचे पाणी काही अंतरावरून शेणाने, चिखल मातीत सारवलेल्या आडात आणून रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते. शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते.

या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर शेतकऱ्यांकडून भिजवले जाते.

डोंगरमाथ्यावर दरवर्षी अतिपर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची, मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस झऱ्यांना खूप पाणी असते. जसजसा उन्हाळा येईल तसतसे झऱ्याचे पाणी कमी होते. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.

गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी काही अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात. साधारण आड बारा-पंधरा फूट लांब, सात-आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. आडातले पाणी आटू नये, यासाठी चिखल माती, शेणाने आड वारंवार सारवला जातो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून साधारण एका वेळेला गुंठाभर शेतजमीन भिजवली जाते.आळीपाळीने ज्याचा दिवस असेल ते आड फोडून शेतजमीन भिजवतात. त्यानंतर पुन्हा शेणाने सारवून त्यात पाणी तुंबवले जाते. शेतजमीन भिजवण्याची ज्यांची वेळ असेल त्यांच्याकडून झऱ्याच्या ठिकाणी छोट्याशा कुंडीतील, पाटातील साफसफाई केली जाते. पाणी कमी येत असल्यास खेकड्यांकडून आड अथवा पाट फोडला आहे का? यावर लक्ष ठेवले जाते.

आड शेणाने, चिखल मातीत सारवणे, लिपणे बऱ्याचदा करतात. सकाळी आड फोडल्यानंतर संध्याकाळपर्यंत पाण्याने भरला जातो. झऱ्याला मुबलक पाणी असूनही शेती भिजवता येत नाही; परंतु ते पाणी आडात साठवून ठेवल्यास शेतजमीन लवकर भिजवण्यास मदत होते. तासाभरात आड रिकामा होतो. पाटाऐवजी बऱ्याच ठिकाणी पाईपदेखील वापरतात. ऑक्टोबर,नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च असे सहा महिने आडाचा वापर होतो.

बहुतांशी ठिकाणी अनेकविध गावांत अशा प्रकारची पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे. एक दिवस सगळे एकत्रित येऊन आड बनवतात. आपल्याला मिळालेल्या कालावधीनुसार साधारण दोन दिवसांत जेवढे रान भिजेल तेवढे भिजवले जाते. नंतर दुसऱ्याची बारी येते. -प्रदीप शिंदे, कासाणीमुरा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारFarmerशेतकरी