शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रॉबेरीला हवामान पोषक; पण ‘अवकाळी’ घातक

By admin | Updated: January 2, 2015 00:07 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : दहा वर्षांत पहिल्यांदाच वातावरणात बदल; नगदी पिकावर उत्पादकांचे बारकाईने लक्ष

सातारा : महाबळेश्वरची ओळख केवळ थंड हवेचं ठिकाण राहिली नसून ते एक ‘स्ट्रॉबेरी लँड’ म्हणूनही ओळखले जाते. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक. या फळासाठी येथील हवामान देखील अनुकूल आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे ‘स्ट्रॉबेरी’वर अवकाळी संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली असून, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकरी पहिल्यांदाच हिवाळ्यात अशा प्रकारच्या वातावरणाचा अनुभव घेत आहेत.
गेली कित्येक वर्षे येथील शेतकरी स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करीत आहे. देशात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८७ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वरमधून घेतले जाते. आज महाबळेश्वर तालुक्यात ४० गावांतील सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात. स्ट्रॉबेरी या फळासाठी आवश्यक असणारी थंड हवा, लाल हलकी माती, समुद्र सपाटीपासून ४ हजार ३०० फूट उंची आदी गुणधर्म याठिकाणी आढळतात. यामुळे स्ट्रॉबेरी येथील मुख्य पीक आहे.
‘स्ट्रॉबेरी’ हे थंड हवेत येणारे फळ आहे. मात्र, वातावरणात बदल झाल्यास याचा पिकावरही परिणाम होतो. सध्या वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या पिकाला धोका निर्माण झाला आहे. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने व काही ठिकाणी रोपांवरील हिमकणांचे दवबिंदूत रूपांतर होत असल्याने पिके कुजण्याचे प्रकार घडत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच पाऊस पडण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)


वातावरणातील बदलाचे गणीत सुटेना
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दहा-पंधरा वर्षांत हिवाळ्यामध्ये पावसासारखी वातावरणनिर्मिती या अगोदर कधीच पाहावयास मिळाली नाही. स्ट्रॉबेरीसाठी थंड हवामान पोषक असल्यामुळे प्रामुख्याने हिवाळा ऋतूत येथे स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, सध्या वातावरणात होत असलेल्या ससतच्या बदलाचे गणित शेतकऱ्यांना देखील सुटेनासे झाले आहे. ‘अवकाळी पाऊस नको’ एवढीच इच्छा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे.



पाऊस पडला तर स्ट्रॉबेरीचे नुकसान होणार आहे. सध्या रोपांना फुले आली आहेत. पावसामुळे फुले झडून जातात. तर फळांवरही डाग पडतात. त्यामुळे उत्पादन घटते व मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. याबरोबरच बाजारपेठेतही स्ट्रॉबेरीची मागणी कमी होते.
- श्रीपती भिलारे
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, अवकाळी