शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सातारा जिल्ह्यातील धरणांत अजून साठा, सिंचनासाठी कमी वाटा; कोयनेसह अन्य धरणातील पाणीसाठा..जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:02 IST

सध्या धोम, उरमोडीतून सिंचनासाठी विसर्ग, उन्हाळ्यात मागणी वाढणार

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत होती. त्यानंतरही अवकाळी पाऊस झाल्याने सिंचनासाठी अजूनही पाण्याची मागणी कमी आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरही प्रमुख सहा धरणांत तब्बल ११२ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र, उन्हाळ्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणातून पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही तरतूद केलेली आहे. मागणीप्रमाणे पाणी विसर्ग होतो. या सर्व प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७६ टीएमसी इतकी आहे. मागील चार वर्षांत जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच धरणे तुडुंब भरतात. त्यातच ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत आहे. अनेक वेळा नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाचा फटका बसतो. त्यामुळे याचा परिणाम हा रब्बी पेरणी तसेच सिंचनाच्या पाणी मागणीवरही झालेला आहे.जिल्ह्यातील धरणातून अनेक तालुक्यातील सिंचनासाठी पाणी साेडले जाते. तसेच येथील धरणातील पाणी हे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही आरक्षित आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. पण, यंदा अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात उन्हाळा आहे. त्यावेळी सिंचनाला पाणी मागणी वाढू शकते.

सध्या धोम, उरमोडीतून सिंचनासाठी विसर्ग...सध्या कोयना धरणातून पायथा वीजगृहासाठी २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धोम धरणाच्या उजव्या कालव्यातून ५१६ क्यूसेक पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे. तर उरमोडीतून डाव्या कालव्याद्वारे ४५० आणि नदीमार्गे २०० क्यूसेक पाणी सिंचनासाठीच सोडले जात आहे. तर कण्हेर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी साेडले जात होते. हे पाणी १३ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे.उरमोडीच्या पाण्याचा कमी वापर...सातारा तालुक्यात ९.९६ टीएमसी क्षमतेचे उरमोडी धरण आहे. या धरणातील पाणी सातारा, माण आणि खटाव तालुक्यातील सिंचनासाठी आरक्षित आहे. पण, या धरणावरील सिंचन योजनेची कामे सुरूच आहेत. त्यामुळे धरणातील सिंचनासाठी तरतूद केलेल्या सर्व पाण्याचा वापरच होत नाही. पाणी धरणामध्येच राहते.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे - गतवर्षी - यावर्षी - यंदाची टक्केवारी - एकूण क्षमता

  • धोम - ८.०६ - १०.११ - ७४.९२ - १३.५०
  • कण्हेर - ७.१५ - ६.५३ - ६४.६३ - १०.१०
  • कोयना - ८०.९८ - ७६.०८ - ७२.२८ - १०५.२५
  • बलकवडी - ३.४१ - ६.५३ - ८३.५० - ४.०८
  • उरमोडी - ९.१४ - ७.७९ - ७८.१९ - ९.९६
  • तारळी - ४.५० - ४.६८ - ७९.९८  - ५.८५ 
टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणी