शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

पाणीटंचाई मिटणार : सरपंचांनी श्रमदानातून पिण्याच्या पाणवठा स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 2:59 PM

water scarcity Kas Bamnoli sataranews-बामणोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईनगर, म्हावशी व सावरी गावांना डोंगरातील झऱ्यांचे गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु सध्या या झऱ्यांचे पाणी खूपच कमी झाले आहे. यावर उपाय म्हणून बामणोलीच्या नूतन सरपंच जयश्री गोरे यांनी म्हावशी गावामध्ये ओढयालगत असणारा आड नावाचा पाणवठा उकरण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात दगड, गोठे, गाळ येऊन बसला होता. सरपंचांनी महिला व युवकांना प्रेरित करून गाळ काढण्याचे ठरविले. स्वतः पाच तास श्रमदान केले. यातून तीन ट्रॉली गाळ काढला.

ठळक मुद्देपाणीटंचाई मिटणार : सरपंचांनी श्रमदानातून पिण्याच्या पाणवठा स्वच्छपिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोणताही निधी न घेता तीन ट्रॉली गाळ काढला

बामणोली : बामणोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईनगर, म्हावशी व सावरी गावांना डोंगरातील झऱ्यांचे गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु सध्या या झऱ्यांचे पाणी खूपच कमी झाले आहे. यावर उपाय म्हणून बामणोलीच्या नूतन सरपंच जयश्री गोरे यांनी म्हावशी गावामध्ये ओढयालगत असणारा आड नावाचा पाणवठा उकरण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात दगड, गोठे, गाळ येऊन बसला होता. सरपंचांनी महिला व युवकांना प्रेरित करून गाळ काढण्याचे ठरविले. स्वतः पाच तास श्रमदान केले. यातून तीन ट्रॉली गाळ काढला.उन्हाळा सुरू झाल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग हा सह्याद्री पर्वतरांगांच्या तीव्र उतार व डोंगरदऱ्या खोऱ्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडूनही पाणी वाहून जाते. तीव्र उतारामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. उन्हाळ्यात बामणोली, तापोळा, कास परिसरातील अनेक गावे, वाड्या, वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तो स्वच्छ केल्याने हा पाणवठा गावाबाहेर जंगला जवळ असल्याने जंगलातील ससे, हरणे, मोर, डुक्कर व अनेक पक्षी यांना उन्हाळभर पिण्यासाठी उपयोग होणार आहे.

म्हावशी गावात उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर उपाय म्हणून मी महिला व तरुणांना माहिती देऊन गावच्या जुन्या पाणवठ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. स्वतः त्यांच्याबरोबर श्रमदान करून तीन ट्रॉली गाळ काढला. या श्रमदानासाठी मी ग्रामपंचायतीचा कोणताही निधी खर्च केला नाही.- जयश्री गोरे,सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत बामणोली कसबे ता. जावली.

गावच्या सरपंचांनी आम्हाला पाणवठ्यातील गाळ काढण्याचे आवाहन केले. आम्ही दहा, बारा जणांनी सुमारे पाच तास श्रमदान करून पाणवठा स्वच्छ केला. तेथे स्वच्छ पाणी साठले आहे. या पाण्याचा माणसांबरोबर जनावरे तसेच वन्यप्राणी व पक्ष्यांनाही पिण्यासाठी होणार आहे.- अंकुश उतेकर,ग्रामस्थ म्हावशी ता. जावळी.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसरKas Patharकास पठार