शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चार हजार पोलिसांचा बंदवर ‘वॉच’ चौकाचौकात बंदोबस्त : जिल्ह्यातील संस्था अन् संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:23 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, जवळपास चार हजार पोलीस

ठळक मुद्दे; खंडाळ्यात जमाव पांगविण्याचे मॉकड्रिल

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, जवळपास चार हजार पोलीस बंदवर ‘वॉच’ ठेवणार आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाचा भाग म्हणून क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काही संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मदतीला पाच एसआरपी, दोन आरसीपीच्या तुकड्या आणि पाच स्टाईकिंग फोर्सची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील पोलिसांची कुमकही मागविण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास चार हजार पोलिसांचा वॉच या बंदवर असणार आहे.साध्या वेशातील पोलिसांवर मदार..गेल्या महिन्यात मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी तोडफोड अन् दंगलीचा प्रकार घडला होता. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला होता. काही तोडफोड करणारे युवक आणखी दंगल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती साध्या वेशातील पोलिसांनी दिली होती. गुरुवारच्या बंद काळातही साध्या वेशातील पोलिसांवर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.जमावाचा हल्ला अन् पोलिसांचे प्रत्युत्तरखंडाळा : तरुणांचा गोंगाट, जमावाचा हल्ला आणि त्यावर पोलिसांनी केलेला प्रतिबंध यामुळे खंडाळा येथील बसस्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे पाहणाºयांच्या नजरा विस्फारल्या. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या ९ आॅगस्ट रोजी होणाºया बंदच्या पार्श्वभूमीवर खंडाळा पोलिसांनी जमाव पांगविण्याचे प्रात्यक्षिक केले असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.मराठा क्रांती मोर्चाचा अखेरचा टप्पा म्हणून शासनाला ९ आॅगस्टचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने दिलेल्या सूचनांनुसार खंडाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा येथे जमाव पांगवणे, ऐनवेळी उद्भवणाºया आपत्तीला सामोरे जाणे यासाठी पोलीस अधिकारी व राज्य राखीव दलाच्या पथकांसह खंडाळा येथील स्थानिक पोलीस जवानांनी हे प्रात्यक्षिक केले.खंडाळा बसस्थानकावर सायंकाळच्या वेळी महाविद्यालयातील मुलांची मोठी गर्दी असते. त्यावेळी हे प्रात्यक्षिक करण्यात आले. पोलिसांनी अचानक केलेल्या या प्रात्यक्षिकामुळे बसस्थानकावर काही काळ गोंगाट निर्माण झाला. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खंडाळा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवरएसटी बसेसच्या सर्व फेºया रद्दसातारा : ‘मराठा आरक्षणप्रश्नी नऊ आॅगस्ट क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी पहाटेपासूनच एसटीच्या फेºया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती आटोक्यात असल्याचा निरोप पोलिसांकडून मिळाल्यानंतर त्या दुपारनंतर पूर्ववत करण्यात येतील,’ अशी माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.क्रांतिदिनी होणाºया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेतून एसटीच्या सर्व फेºया पहाटेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन शांततेत होण्याची शक्यता वर्तविली आहे. दुपारी साडेतीननंतर आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांकडून निरोप मिळाल्यानंतर एसटीच्या फेºया पूर्ववत करण्यात येणार आहेत.