शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शर्यत बंदी विरोधात बळीराजा रस्त्यावर

By admin | Updated: January 22, 2017 23:48 IST

कऱ्हाडात निदर्शने : बंदी उठवा अन्यथा तीव्र आंदोलन; बैलगाडी चालक-मालक संघटनेचा इशारा

कऱ्हाड : तामिळनाडू येथे जलीकट्टूला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर तेथील सरकारने पुन्हा शर्यती सुरू केल्या. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्यापही शर्यतींना मंजुरी दिलेली नाही. तसेच शर्यतींना ‘पेटा’ संस्था आणि प्राणीमित्र संघटनांची विरोध केल्यामुळे शर्यतींवर घातलेली बंदी राज्य शासनाने तत्काळ उठवावी, तसेच ‘पेटा’ संस्था व प्राणीमित्र संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी करीत कऱ्हाड येथे रविवारी अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे राज्याध्यक्ष धनाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने शर्यतीबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचा शिंदे यांनी यावेळी इशारा दिला.यावेळी पैलवान आनंदराव मोहिते, उदयसिंह पाटील, प्रकाश आळते, अ‍ॅड. जितेंद्र पाटील, युवराज पाटील, बापूराव चव्हाण, गोपीचंद तपासे, राजेंद्र जाधव, संदीप बाबर, हेमंत करांडे, हृषीकेश मोरे आदींसह कऱ्हाड तालुक्यातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धनाजी शिंदे म्हणाले, ‘तामिळनाडू सरकारने जलीकट्टूच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. मात्र, महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना राज्य शासनाकडून यास प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी शर्यती सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी द्यावी, जेणेकरून तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू होतील. २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी व जलीकट्टू या बैलांच्या खेळावरील बंदी कायम केली होती. त्यानंतर पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून शिष्टमंडळाने बैलगाड्या चालक, हातगाडीवाले यासह अनेक व्यावसायिकांचा प्रपंच रस्त्यावर आल्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेत त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून बैलगाडी शर्यती निश्चित सुरू करण्यात येतील, असे केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैलगाड्या शर्यती सुरू करण्याबाबत चर्चा केली. चर्चेमधून पंतप्रधान मोदींनी यास परवानगी दिली. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी घोषणा केली. मात्र, त्यावेळी ‘पेटा’ व प्राणीमित्र संघटनेने पुन्हा या निर्णयाला आव्हान दिले. तेव्हा पुन्हा सर्वाेच्च न्यायालयाने शर्यतींना स्थगिती दिली. आता नुकतेच तामिळनाडू येथे झालेल्या आंदोलनानंतर केंद्राने मान्यता दिल्यानंतर तामिळनाडू सरकारने तेथे जलीकट्टू, बैलगाडी शर्यतींना मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारनेही राज्यात बैलगाडी शर्यती सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येतील.’यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ व दत्ता चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आनंदाराव मोहिते, उदयसिंह पाटील, प्रकाश आळते यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन करण्यापूर्वी संघटनेच्या वतीने शनिवारी प्रशासनास याबाबत निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)