शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’त सातारा जिल्ह्याचा डंका; तीन गावांना ५० लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:43 IST

अधिकाऱ्यांचीही सर्वोत्तम कामगिरी

सातारा : माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वरुड, कळंबे आणि समर्थगाव ग्रामपंचायतीने विभागस्तरावर विविध गटांत यश मिळवले. या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खंडाळा व पाटण गटविकास अधिकाऱ्यांचा सर्वोत्तम अधिकारी म्हणूनही गाैरव होणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्याचा या अभियानात डंका वाजला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली. तर, माझी वसुंधरा अभियान ५.० हे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांत १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात राबविण्यात आले. अभियानात सर्वोत्तम ठरलेल्या संस्थांना रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही अनेक संस्थांना बक्षीस जाहीर झालेले आहे.ग्रामपंचायत विभागात २ ते ३ हजार लोकसंख्या गटात पुणे विभागस्तरावर खटाव तालुक्यातील वरुड ग्रामपंचायतीला बक्षीस मिळाले आहे. दीड ते दोन हजार लोकसंख्या गटात विभागस्तरावर सातारा तालुक्यातील कळंबे ग्रामपंचायत, तर एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात विभागस्तरावर सातारा तालुक्यातील समर्थगाव ग्रामपंचायतीला बक्षीस मिळाले आहे. या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लाख मिळणार आहेत.राज्यस्तरावर अधिकाऱ्यांसाठीही सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षिसे होती. यामध्ये सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा राज्यस्तरावर तृतीय क्रमांक आला आहे. विभागस्तरावर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा प्रथम क्रमांक आला आहे. तसेच, विभागस्तरावर खंडाळा गटविकास अधिकारी यांनाही सर्वोत्तम कामगिरीबद्दल तृतीय बक्षीस जाहीर झाले आहे. जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यातून पाटणच्या गटविकास अधिकाऱ्यांची निवड झालेली आहे.दरम्यान, या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सीद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदींनी विजेत्या गावांचे काैतुक केले.

२१ फेब्रुवारीला बक्षीस वितरण...माझी वसुंधरा अभियान ५.० मधील सर्वोतम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि अभियान ४.० मध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त जिल्ह्यातील मान्याचीवाडी, ता. पाटण ग्रामपंचायतीचा सन्मान सोहळा दि. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यश मिळवले. यामुळे जिल्ह्याचा नावलाैकिक आणखी वाढण्यास मदत झालेली आहे. ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले. यापुढेही शासनाच्या योजना, अभियान यशस्वी करून जिल्ह्याचा नावलाैकिक वाढवू. ग्रामपंचायतीबरोबरच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचेही अभिनंदन. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी 

English
हिंदी सारांश
Web Title : Satara District Shines in 'Majhi Vasundhara'; Three Villages Win Awards

Web Summary : Satara's Varud, Kalambe, and Samarthgav win ₹50 lakh each in Majhi Vasundhara Abhiyan 5.0. District officials also recognized for outstanding performance. Awards ceremony on February 21st in Mumbai.