शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:20 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, त्यातच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात २७९५ ठिकाणचे पाणी नमुने घेतले होते. त्यामधील ७६ ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित असल्याचं स्पष्ट झालंय.पाणी हेच जीवन म्हटले जात असलेतरी आजही स्वच्छ व पुरेसे पाणी योग्य प्रमाणात मिळते, अशी स्थिती नाही. त्यातच गावातील लोकांना नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत असले तरी वाडी वस्तीवर आजही अनेक ठिकाणी असे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाडीवरील ग्रामस्थ विहिरी, हातपंप, बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवतात. जिल्ह्याचा विचार करता यंदा माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत दुष्काळाची भीषणता आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत पाण्याचे टँकर सुरू आहेत. फरक एवढाच की टँकरग्रस्त गावांची संख्या कमी अधिक आहे. सर्वात अधिक माण तालुक्यातील ७६ गावांना टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यात २५० हून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा होतोय.या टँकरद्वारे मिळणारे पाणी हे किती शुद्ध असेल, हे ठामपणे सांगणेही अवघड आहे. कारण, तलावाच्या ठिकाणी असणाऱ्या फिडिंग पॉर्इंटवरून पाणी टँकरमध्ये भरून ते लोकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पाण्यात गढूळपणा दिसून येतोच. तरीही लोकांना चांगले पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभाग दक्ष असतो. त्यासाठी दर महिन्याला निश्चित केलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येतात. एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाने २७९५ ठिकाणचे नमुने घेतले. त्यातील ७६ ठिकाणचे नमुने हे दूषित निघाले. याचा अर्थ हे पाणी लोकांना पिण्यासाठी योग्य नाही, असाच आहे.सातारा तालुक्यातील ३७२ ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील १ नमुना हा प्रयोग शाळेतील तपासणीत दूषित निघाला. तर जावळी तालुक्यात २३९, महाबळेश्वर १३९ नमुने घेतले; पण एकही दूषित आला नाही. वाई तालुक्यात १५६ पैकी ९ नमुने दूषित आले. खंडाळा ५० पैकी २, माण ३१० पैकी १, पाटणला ३१८ पैकी ४ ठिकाणचे नमुने हे दूषित पाणी असणारे आले आहेत.फलटण, कºहाड, खटाव अन्कोरेगावमध्ये अधिक दूषित नमुने...जिल्ह्यातील फलटण, कºहाड, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील पाणी नमुने इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक दूषित आलेत. फलटणमध्ये २३५ पैकी १६, खटाव ४६५ मधील १३, कोरेगावला २३६ पैकी ११ तर कºहाडला २७५ मधील १९ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झालं आहे.