शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

जिल्ह्यातील ७६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:20 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, त्यातच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात २७९५ ठिकाणचे पाणी नमुने घेतले होते. त्यामधील ७६ ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित असल्याचं स्पष्ट झालंय.पाणी हेच जीवन म्हटले जात असलेतरी आजही स्वच्छ व पुरेसे पाणी योग्य प्रमाणात मिळते, अशी स्थिती नाही. त्यातच गावातील लोकांना नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत असले तरी वाडी वस्तीवर आजही अनेक ठिकाणी असे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाडीवरील ग्रामस्थ विहिरी, हातपंप, बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवतात. जिल्ह्याचा विचार करता यंदा माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत दुष्काळाची भीषणता आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत पाण्याचे टँकर सुरू आहेत. फरक एवढाच की टँकरग्रस्त गावांची संख्या कमी अधिक आहे. सर्वात अधिक माण तालुक्यातील ७६ गावांना टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यात २५० हून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा होतोय.या टँकरद्वारे मिळणारे पाणी हे किती शुद्ध असेल, हे ठामपणे सांगणेही अवघड आहे. कारण, तलावाच्या ठिकाणी असणाऱ्या फिडिंग पॉर्इंटवरून पाणी टँकरमध्ये भरून ते लोकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पाण्यात गढूळपणा दिसून येतोच. तरीही लोकांना चांगले पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभाग दक्ष असतो. त्यासाठी दर महिन्याला निश्चित केलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येतात. एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाने २७९५ ठिकाणचे नमुने घेतले. त्यातील ७६ ठिकाणचे नमुने हे दूषित निघाले. याचा अर्थ हे पाणी लोकांना पिण्यासाठी योग्य नाही, असाच आहे.सातारा तालुक्यातील ३७२ ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील १ नमुना हा प्रयोग शाळेतील तपासणीत दूषित निघाला. तर जावळी तालुक्यात २३९, महाबळेश्वर १३९ नमुने घेतले; पण एकही दूषित आला नाही. वाई तालुक्यात १५६ पैकी ९ नमुने दूषित आले. खंडाळा ५० पैकी २, माण ३१० पैकी १, पाटणला ३१८ पैकी ४ ठिकाणचे नमुने हे दूषित पाणी असणारे आले आहेत.फलटण, कºहाड, खटाव अन्कोरेगावमध्ये अधिक दूषित नमुने...जिल्ह्यातील फलटण, कºहाड, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील पाणी नमुने इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक दूषित आलेत. फलटणमध्ये २३५ पैकी १६, खटाव ४६५ मधील १३, कोरेगावला २३६ पैकी ११ तर कºहाडला २७५ मधील १९ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झालं आहे.