शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिल्ह्यातील ७६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:20 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, त्यातच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात २७९५ ठिकाणचे पाणी नमुने घेतले होते. त्यामधील ७६ ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित असल्याचं स्पष्ट झालंय.पाणी हेच जीवन म्हटले जात असलेतरी आजही स्वच्छ व पुरेसे पाणी योग्य प्रमाणात मिळते, अशी स्थिती नाही. त्यातच गावातील लोकांना नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत असले तरी वाडी वस्तीवर आजही अनेक ठिकाणी असे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाडीवरील ग्रामस्थ विहिरी, हातपंप, बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवतात. जिल्ह्याचा विचार करता यंदा माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत दुष्काळाची भीषणता आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत पाण्याचे टँकर सुरू आहेत. फरक एवढाच की टँकरग्रस्त गावांची संख्या कमी अधिक आहे. सर्वात अधिक माण तालुक्यातील ७६ गावांना टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यात २५० हून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा होतोय.या टँकरद्वारे मिळणारे पाणी हे किती शुद्ध असेल, हे ठामपणे सांगणेही अवघड आहे. कारण, तलावाच्या ठिकाणी असणाऱ्या फिडिंग पॉर्इंटवरून पाणी टँकरमध्ये भरून ते लोकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पाण्यात गढूळपणा दिसून येतोच. तरीही लोकांना चांगले पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभाग दक्ष असतो. त्यासाठी दर महिन्याला निश्चित केलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येतात. एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाने २७९५ ठिकाणचे नमुने घेतले. त्यातील ७६ ठिकाणचे नमुने हे दूषित निघाले. याचा अर्थ हे पाणी लोकांना पिण्यासाठी योग्य नाही, असाच आहे.सातारा तालुक्यातील ३७२ ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील १ नमुना हा प्रयोग शाळेतील तपासणीत दूषित निघाला. तर जावळी तालुक्यात २३९, महाबळेश्वर १३९ नमुने घेतले; पण एकही दूषित आला नाही. वाई तालुक्यात १५६ पैकी ९ नमुने दूषित आले. खंडाळा ५० पैकी २, माण ३१० पैकी १, पाटणला ३१८ पैकी ४ ठिकाणचे नमुने हे दूषित पाणी असणारे आले आहेत.फलटण, कºहाड, खटाव अन्कोरेगावमध्ये अधिक दूषित नमुने...जिल्ह्यातील फलटण, कºहाड, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील पाणी नमुने इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक दूषित आलेत. फलटणमध्ये २३५ पैकी १६, खटाव ४६५ मधील १३, कोरेगावला २३६ पैकी ११ तर कºहाडला २७५ मधील १९ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झालं आहे.