शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यातील ७६ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:20 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठलाय. तर बोअरवेल निकामी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, त्यातच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात २७९५ ठिकाणचे पाणी नमुने घेतले होते. त्यामधील ७६ ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित असल्याचं स्पष्ट झालंय.पाणी हेच जीवन म्हटले जात असलेतरी आजही स्वच्छ व पुरेसे पाणी योग्य प्रमाणात मिळते, अशी स्थिती नाही. त्यातच गावातील लोकांना नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत असले तरी वाडी वस्तीवर आजही अनेक ठिकाणी असे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाडीवरील ग्रामस्थ विहिरी, हातपंप, बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवतात. जिल्ह्याचा विचार करता यंदा माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत दुष्काळाची भीषणता आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत पाण्याचे टँकर सुरू आहेत. फरक एवढाच की टँकरग्रस्त गावांची संख्या कमी अधिक आहे. सर्वात अधिक माण तालुक्यातील ७६ गावांना टँकर सुरू आहेत. तर जिल्ह्यात २५० हून अधिक टँकरद्वारे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा होतोय.या टँकरद्वारे मिळणारे पाणी हे किती शुद्ध असेल, हे ठामपणे सांगणेही अवघड आहे. कारण, तलावाच्या ठिकाणी असणाऱ्या फिडिंग पॉर्इंटवरून पाणी टँकरमध्ये भरून ते लोकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे पाण्यात गढूळपणा दिसून येतोच. तरीही लोकांना चांगले पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभाग दक्ष असतो. त्यासाठी दर महिन्याला निश्चित केलेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येतात. एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाने २७९५ ठिकाणचे नमुने घेतले. त्यातील ७६ ठिकाणचे नमुने हे दूषित निघाले. याचा अर्थ हे पाणी लोकांना पिण्यासाठी योग्य नाही, असाच आहे.सातारा तालुक्यातील ३७२ ठिकाणचे पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील १ नमुना हा प्रयोग शाळेतील तपासणीत दूषित निघाला. तर जावळी तालुक्यात २३९, महाबळेश्वर १३९ नमुने घेतले; पण एकही दूषित आला नाही. वाई तालुक्यात १५६ पैकी ९ नमुने दूषित आले. खंडाळा ५० पैकी २, माण ३१० पैकी १, पाटणला ३१८ पैकी ४ ठिकाणचे नमुने हे दूषित पाणी असणारे आले आहेत.फलटण, कºहाड, खटाव अन्कोरेगावमध्ये अधिक दूषित नमुने...जिल्ह्यातील फलटण, कºहाड, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील पाणी नमुने इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक दूषित आलेत. फलटणमध्ये २३५ पैकी १६, खटाव ४६५ मधील १३, कोरेगावला २३६ पैकी ११ तर कºहाडला २७५ मधील १९ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झालं आहे.