शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...तर मराठा आरक्षणासाठी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:02 IST

मराठा आरक्षणाच्याबाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने ताकदीने बाजू मांडली होती. मात्र सध्याचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले आहे. राज्य सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्याबाबतीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे रस्त्यावर उतरणारमराठा आरक्षणात राज्य सरकार कमी पडले!, अद्यादेश काढण्याची मागणी

सातारा : मराठा आरक्षणाच्याबाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने ताकदीने बाजू मांडली होती. मात्र सध्याचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले आहे. राज्य सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.खा. उदयनराजे यांनी समाजमाध्यमावर आपले मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु.

या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे. मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ह्यमराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली ही बाब दुर्देवी असून समाजासाठी अन्यायकारक आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज जे पाऊल उचलेल ते सर्वांना मान्य असेल. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी, समाजाच्या निर्णयानुसार आरक्षणासाठी प्रसंगी पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात विधेयक टिकवले. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आपली बाजू नीट मांडली नाही, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, सरकारने गांभीर्याने लक्ष घालून आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे, ही सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. मराठा समाज फार मोठा आहे. या समाजातील असंख्य लोक आर्थिक मागास आहेत.

समाजाच्या अनेक अडचणी आहेत. त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाचा जो निर्णय होईल तो मान्य करुन प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी उतरु आणि आंदोलन करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे या पत्रकात म्हटले आहे.

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतीम निकाल येत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोरकभरतीतले आरक्षण कायम ठेवावे, यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे.- उदयनराजे भोसलेखासदार

 

मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला, मोर्चे काढले. एवढं सगळं करुन जर आरक्षणाला स्थगिती मिळत असेल तर खूपच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा.-शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले