शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २४६ प्रकरणे निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:21 IST

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण ११ हजार १० वादपूर्ण प्रकरणे ठेवण्यात आली होती.

सातारा: राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण ११ हजार १० वादपूर्ण प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २४६ प्रकरणे निकाली निघाली. सातारा जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते झाले

जिल्ह्यात एकूण ९ हजार ९८८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७०२ प्रकरणात तडजोड झाली. त्यामध्ये एकूण ७,२४,०७, २४८ रुपयांची वसुली करण्यात आली. भूसंपादन प्रकरणे २२७ ठेवण्यात आली. त्यापैकी १९ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामधून १,३६,८१,३०९ नुकसान भरपाई रक्कम देण्यात आली. तसेच मोटार अपघात प्रकरणे ३५८ ठेवण्यात आली. त्यापैकी ८ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून ६०,६९,७४७ रुपये देण्यात आली. यामध्ये वैवाहिक वाद, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचीही प्रकरणे तसेच कर्ज, धनादेश न वटल्याची प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

तसेच जिल्हा न्यायालयात एकूण ९ पॅनलवर जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे, एस. आर. पवार, बी. एस. वावरे तसेच इतर सर्व न्यायीक अधिकारी वकील, ज्येष्ठ नागरिक, विधी स्वयंसेवकांनी या अदालतीचे काम पाहिले. लोकअदालतीमधून प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, यासाठी भविष्यात आणखी प्रबोधन केले जाईल, असे  वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रवीण कुंभोजकर यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय