शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाच्या भुताला एकदाचा उतारा!

By admin | Updated: January 3, 2015 00:15 IST

शिक्के उठणार : शासनाच्या निर्णयाचा सातारा जिल्ह्यातील ४४७ गावांना होणार लाभ

सातारा : जिल्ह्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. धरण प्रकल्पात बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के उठविण्यात येणार असून, जिल्ह्यातील सुमारे ४४७ गावांच्या मानगुटीवर बसलेले पुनर्वसनाच्या शिक्क्यांचे भूत एकदाच हद्दपार होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात एकूण १८ प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या बाधित गावांचे बुडित क्षेत्र व लाभ क्षेत्र असे दोन वर्गीकरण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आला, तेथील गावे पाणी योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाभक्षेत्रात वसविण्यात आली. प्रत्येक प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा वेगवेगळा स्लॅब आहे. ४, ६ व ८ एकर असे स्लॅबचेही वर्गीकरण करण्यात आले आहे. इतक्या जमीन क्षेत्राच्या वर एका खातेदाराच्या नावावर जमीन असेल तर ती जमीन प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र, शासनाने बुडित व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत असताना त्या जमिनींच्या सात-बाऱ्यावर ‘पुनर्वसन’ असे शिक्के मारले आहेत. या शिक्क्यांमुळे जमिनींची विक्री करताना, गहाण खत करताना, जमिनीचे वारसांमध्ये वाटप करताना अडचणी येत आहेत.
यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो. या शेतकऱ्यांची होणारी होरपळ थांबावी, या उद्देशाने शासनाने नियमानुसार स्लॅबच्या आत असणाऱ्या जमिनींच्या सात-बाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात स्लॅब वगळता बाधित शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के काढले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात कॅनॉलच्या वरच्या क्षेत्रातील (ज्या ठिकाणी पाण्याचा लाभ होत नाही) शेतकऱ्यांच्या जमिनीवरी पुनर्वसनाचे शिक्के उठविण्यात येतील.
तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्या जमिनी संपादित करून झाल्या आहेत. मात्र, तरीही संबंधित शेतकऱ्यांच्या इतर क्षेत्रावर पुनर्वसनाचे शिक्के आहेत, ते काढून टाकले जाणार आहेत. (प्रतिनिधी)


पुनर्वसनाचे शिक्के असणाऱ्या गावांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. संबंधित गावांतील तलाठ्यांच्या माध्यमातून ही माहिती काही दिवसांत संकलित होईल. पहिल्या टप्प्यात ७० टक्के बाधित क्षेत्रावरील पुनर्वसनाचे शिक्के जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली काढण्यात येतील.
- सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन