शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढली, तासवडेत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:28 IST

लॉकडाऊनमुळे गत आठ महिन्यात घराबाहेर पडता न आलेली मंडळी कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे आली होती. हे चाकरमानी आता शहराकडे परतू लागले असून, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे, ता. कऱ्हाड टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

ठळक मुद्देटोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढलीतासवडेत रांगा : पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी घाईगडबड

कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे गत आठ महिन्यात घराबाहेर पडता न आलेली मंडळी कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे आली होती. हे चाकरमानी आता शहराकडे परतू लागले असून, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे, ता. कऱ्हाड टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.आठ महिन्यांपूर्वी कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. परिणामी नाईलाजाने सर्वांना घरात थांबावे लागले होते. लॉकडाऊनमुळे देवदर्शनासह अनेकांची इतर कामेही रखडली होती. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे गत आठ महिन्यांत घराबाहेर पडता न आलेली मंडळी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपली रखडलेली कामे करण्यासाठी व नातेवाइकांच्या भेटीगाठीसाठी गावी आली होती.गत आठवड्यात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या लेनवर वाहनांची गर्दी दिसून येत होती. मात्र, सध्या दिवाळी सण आटोपून अनेकजण नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबईकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूर ते सातारा लेनवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.देवदर्शनासाठीही अनेकांची धावाधावगत आठवड्यापासून राज्यातील बंद असलेली मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाला असल्याने देवदर्शनासह पर्यटनासाठीही अनेकजण बाहेर पडले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वर्दळ आणखी वाढली आहे. टोलनाक्यावरून वाहनधारकांना सहज व जलदरीत्या प्रवास करता यावा यासाठी जादा मनुष्यबळासह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्गSatara areaसातारा परिसर