शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट ...

वाई : वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर रेती गेल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. जोर रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. प्रशासनाने लवकर दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भात लागणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने मौजे बलकवडी (ता. वाई) व नांदगणे फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध, भाताची रोपे वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे बोरगाव - दह्याट मुख्य रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने पंधरा गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला आहे.

दरम्यान, आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, उपसभापती विक्रांत डोंगरे, ज्ञानदेव सणस, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रमोद अनपट, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, श्रीकांत निकाळजे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन मदत कार्याला गती दिली.

चौकट...

दळणवळण सुरू करण्याची मागणी...

जोर येथे भूस्खलन होऊन तीन घरांवर वाळू आल्याने दोन घरे गाडली गेली आहेत. यामध्ये मायलेक वाहून गेले आहेत. जोरच्या रस्त्यावरील तीन पूल वाहून गेल्याने जोर गावात अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकर याठिकाणी दाखल होऊन दळणवळण सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.