शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या शाळेत शिक्षकांची ‘शाळा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

सातारा : सेवाजेष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा पदभार सोपविणे अपेक्षित असताना सातारा पालिकेच्या काही शाळांमध्ये या नियमाचे उल्लंघन करण्यात आले ...

सातारा : सेवाजेष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकपदाचा पदभार सोपविणे अपेक्षित असताना सातारा पालिकेच्या काही शाळांमध्ये या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. १८ पैकी ५ शाळांच्या मुख्याध्यापकपदाची सूत्रे कनिष्ठ शिक्षकांच्या हाती सोपविली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या या ‘शाळे’बाबत राष्ट्रीय रोस्टर हक्क-अधिकार न्याय संघटनेने पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही केली आहे.

सातारा शहरात पालिका शिक्षण मंडळाच्या १८ शाळा आहे. यामध्ये तीन उर्दू माध्यमिक आहेत. यापैकी मराठी माध्यमिक पाच शाळा वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शाळा आहेत. तर उर्वरित दहा शाळा या मुख्याध्यापक पात्र नाहीत. त्यामुळे या शाळांचे प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी सर्वसाधारण सेवाज्येष्ठता यादी तयार करून सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार सोपविण्यात यावा, असा शासन निर्णय आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने तयार केलेल्या सेवाज्येष्ठता यादीनुसार ज्या त्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाची सूत्रे सोपविणे क्रमप्राप्त आहे. मात्र पालिकेच्या पाच शाळांमध्ये शासन नियमांचे उल्लंघन करून कनिष्ठ शिक्षकांची मुख्याध्यापकपदी निवड करण्यात आली आहे.

सेवाज्येष्ठता यादी डावलून या निवडी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय रोस्टर हक्क-अधिकार, न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप फणसे यांनी केला आहे. याबाबत पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांना संघटनेने निवेदन दिले आहे. नियमबाह्य करण्यात आलेल्या निवडी रद्द करून वरिष्ठ व पात्र शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाची सूत्रे द्यावीत, अशी मागणी केली आहे.

(चौकट)

नगरपालिका शाळांचा स्तर का खालावतोय

- इंग्रजी माध्यमिक व खासगी शाळांची संख्या वाढली

- पालिका शाळेत प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले

- बहुतांश शिक्षक एकाच शाळेत दहा-पंधरा वर्षांपासून कार्यरत

- काही शिक्षकांकडून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न

- तर काही शिक्षक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यास व पटसंख्या वाढवण्यास कमी पडत आहेत

- २०१८ रोजी पालिकेच्या १८ शाळांत मिळून जवळपास २ हजार विद्यार्थी व २५० शिक्षक होते

- आता विद्यार्थी संख्या १ हजार २०० तर शिक्षकांची ८४ वर आली आहे.

(चौकट)

याची आहे गरज...

अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकू लागल्या आहेत. खासगी व इंग्रजी माध्यमिक शाळांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहेत. तीन वर्षांनंतर शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे शिक्षकांना नवीन शाळेतील विद्यार्थी घडविण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यास वाव मिळत आहे. तर विद्यार्थ्यांचाही गुणात्मक व बौद्धिक विकास होत आहे. याच धर्तीवर पालिका शाळांमधील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या तर पालिका शाळा देखील स्पर्धेत मागे राहणार नाहीत.

(कोट)

शिक्षण मंडळाने सेवाजेष्ठता यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या एक-दोन दिवसात यादी अद्ययावत करून सेवाज्येष्ठतेनुसार संबंधित शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपविली जाईल.

- मारुती भांगे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ