शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

अनाथ मुलींच्या शिक्षणाचा घेतला वसा- दत्तात्रय सावंत यांनी २५ वर्षांत शिकवली १३० मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:04 IST

दत्तात्रय सावंत यांना २५ वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा अकाली सोडून गेला. त्यानंतर समाजातील अनाथ, गरीब विशेषत: मुलींना शिकवून त्यांना ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतला.

ठळक मुद्दे मजुराची ही कहाणी ।

पांडुरंग भिलारे ।वाई : धकाधकीच्या गतिमान युगात सर्वजण व्यावहारिक विचार करताना दिसत आहेत. सामाजातील तसेच रक्ताच्या नात्यातील माणुसकी लोप पावत असताना दत्तात्रय सावंत यांच्यासारखी देवदूत माणसं याला अपवाद ठरत आहेत़ त्यांनी २५ वर्षांत तब्बल १३० अनाथ, गरीब मुलांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले.

दत्तात्रय सावंत यांना २५ वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा अकाली सोडून गेला. त्यानंतर समाजातील अनाथ, गरीब विशेषत: मुलींना शिकवून त्यांना ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतला. स्वत: अल्पशिक्षित व शेतीही नसल्याने सेंट्रिंगची कामे करून या मुलांचे राहणे व शिक्षणाचा खर्च करत असतात. या कामात त्यांच्या पत्नी मालन यांनीही समर्थ साथ दिली. सर्व मुलांमध्ये काकी या नावाने परिचित होत्या; पण दोन वर्षांपूर्वी त्यांचाही मृत्यू झाला़ आत्ता मुलांची आई आणि वडील म्हणून तेच जबाबदाऱ्या पार पाडू लागले. त्यांच्याकडे सातारा, पुणे, लातूर, नांदेड, जळगाव, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी येत आहेत़ आताही त्यांच्याकडे ३२ मुली असून, आठ ते दहा मुली त्यांच्या घरी वास्तव्यास आहेत. बाकीच्या कोल्हापूर, कºहाड व वारणानगरला शिक्षण घेत आहेत़तीन मुली वकील तर पाच मुली डॉक्टरदत्तात्रय सावंत यांनी तीन मुलींना वकील केले, पाचजणींना डॉक्टर बनविले आहे. बारा प्राध्यापिका, आठ प्राथमिक शिक्षिका, साठ मुली विविध शाखेतून इंजिनिअर केले तसेच अनेकांना पदवीधर केले आहे़ हे सर्व करीत असताना त्यांनी विविध बँका, पतसंस्थांमधून अनेकदा कर्ज काढले. एक स्वत:च्या मालकीचा बंगला विकला; पण मुलींच्या शिक्षणात बाधा येऊन दिली नाही़ त्यांनी आतापर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्यापैकी २२ मुलींचे कन्यादान करून दिले आहे़ २१ मुलींनी कर्माने बाप असणाºया बापूंचे नाव वडील म्हणून लावले असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार मिळाले आहेत.

दत्तात्रय सावंत यांचे अनाथ, गरीब मुली, मुले यांना सहारा देऊन शिक्षण देऊन सक्षम करण्याचे कार्य २५ वर्षे सुरू आहे. आम्ही नवप्रकाश मंडळातर्फे त्यांच्या विधायक कार्यास सहकार्य केले आहे.- विनोद सकुंडे, गंगापुरी, वाई

चंद्रकांत जाधव हा एकमेव मुलगा पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला जात आहे. त्याला राज्य शासनाची स्कॉलरशीप मिळाली. त्यांना पाठविण्यासाठी लागणारा साडेतीन लाख खर्च गोळा करत आहे.- दत्तात्रय सावंत, सातारा 

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिक