शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

बाबांमुळे सूतगिरणी टिकली; अन्यथा आत्महत्याच..

By admin | Updated: October 27, 2015 00:25 IST

अरुण गोरेंचा रणजितसिंहांना टोला : पृथ्वीराज चव्हाणांची मदत विसरणाऱ्यांनी नेहमीप्रमाणे गद्दारी केली

दहिवडी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच उरमोडी आणि जिहे-कटापूर या पाणी योजनांना भरघोस निधी मिळाला, हे सर्व जनतेला माहीत आहे. परंतु ज्यांनी केलेल्या उपकारांची कधीच जाण ठेवली नाही, ज्यांची विचारसरणी नेहमीच सूर्याजी पिसाळांसारखी गद्दारीची राहिली आहे, जे वरिष्ठांची खोटी मर्जी संपादन करून सत्तेला चिकटून राहतात, पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडतात, त्या रणजितसिंह देशमुख यांना पृथ्वीराज चव्हाण, आ. गोरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची तेवढी उंचीही नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी सूतगिरणीला भरीव मदत केली नसती तर तुम्हाला आत्महत्या करावी लागली असती, हे विसरू नका,’ असा टोला माण बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी लगावला.दहिवडी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘दलबदलू रणजितसिंह देशमुख यांना नेहमी सत्तेबरोबर राहायची सवय आहे. त्यासाठी पक्षनिष्ठा लाथाडायला ते एका पायावर नेहमीच तयार असतात. वरिष्ठांची भाटगिरी करून मर्जी संपादन करून वैयक्तिक स्वार्थ साधण्यात ते पटाईत आहेत. अगोदर युतीची सत्ता असताना शिवसेनेबरोबर, नंतर काँग्रेसबरोबर आणि सवयीप्रमाणे आता ते पुन्हा शिवसेनेबरोबर आहेत. पालकमंत्र्यांवरील बेगडी प्रेम दाखविण्यासाठी ते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केलेले उपकार सोयीस्कररीत्या विसरले आहेत. आ. चव्हाण व आ. गोरे यांनी माण-खटावच्या दुष्काळ आणि पाणी योजनांसाठी सर्वाधिक प्रयत्न केले आहेत. रणजितसिंह देशमुख त्यांच्या सूतगिरणीशेजारी येळीव तलावात साठवलेले उरमोडीचे पाणी पितात, त्यांच्या निमसोडच्या शेतात पिकणारा ऊसही उरमोडीच्या पाण्यावरचाच आहे. स्वत:च्या गावात देशमुखांना साधी स्मशानभूमी बांधता आली नाही. गावातील सार्वजनिक रस्ते वैयक्तिक माणसांच्या नावावर आहेत. त्यांनी विकासाची व जिहे-कटापूर पाणी योजनेची वल्गना करू नये. त्यांनी जिहे कुठे आहे आणि कटापूरमध्ये काय करायचे आहे, याची माहिती घ्यावी. त्यांचे आणि विकासकामांचे कधीच जुळले नाही. त्यांना विधानसभा निवडणुकीत माण-खटावच्या जनतेने डिपॉझिट जप्त करून त्यांची जागा दाखवून दिली आहे.अरुण गोरे पुढे म्हणाले, ‘आ. जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धीसाठी कधीच स्टंट केला नाही. जनतेपुढे जिहे-कटापूरविषयी सत्य आणि वास्तव माहिती येण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात गैर काय? सेना-भाजपाच्या सरकारला वर्ष झाले. त्यांनी सातारा जिल्ह्यासाठी काय केले, याचा लेखाजोखा मांडावा. साताऱ्यात एका स्टेजवर येऊन जिहे-कटापूरबाबत जनतेला माहिती देण्याची हिंमत पालकमंत्र्यांनी दाखवावी. साताऱ्याचे मेडिकल कॉलेज त्यांच्या सरकारने रद्द केले आहे. पालकमंत्र्यांनी ते रद्द होऊ नये म्हणून काय प्रयत्न केले, हे स्पष्ट करावे. ‘‘आ. गोरेंनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना माण-खटावमध्ये वारंवार आणले, ते पिकनिकला नव्हे. त्यांनी माण-खटावला येऊनच पाचशे साखळी सिमेंट बंधारे बांधायला निधी दिला, हे देशमुखांना दिसले नाही का?’ (प्रतिनिधी) अर्धवट ज्ञान पाजळवू नये...देशमुख आता शिवसेनेत आहेत. त्यांनी उरमोडीसाठी आ. गोरेंनी दोन कोटींचा चुराडा केला, असा आरोप केला आहे. त्यांनी जलसंपदा विभागाकडून वास्तव माहिती घ्यावी. जो निधी खर्च झाला तो योजनेच्या कामांना पूरकच होता. त्या काळातच उरमोडीचे सर्वाधिक काम पूर्णत्वाकडे गेले होते. कोणतीही माहिती न घेता देशमुखांनी अर्धवट ज्ञान पाजळवूू नये. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा माण-खटावमध्ये आले, तेव्हा न बोलविता जिवाचा आटापिटा करून हेलिपॅडवर हारतुरे घेऊन उपस्थिती दाखविण्यासाठी धडपडणाऱ्या देशमुखांनी वाचाळ बडबड बंद करावी. त्यांची अवस्था नेहमीच ‘बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना’ अशीच असते, असा टोलाही अरुण गोरेंनी शेवटी लगावला.